शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

कॅबिनेट मंत्री सांगतील तरच शिथिल

By admin | Updated: June 12, 2015 02:05 IST

कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी लेखी पत्र दिल्यास आणि फोनवरून सूचना दिली तरच रेती माफियांविरोधातील

 रेती माफियांवरील कारवाई : आमदारांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना साकडे यवतमाळ : कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांनी लेखी पत्र दिल्यास आणि फोनवरून सूचना दिली तरच रेती माफियांविरोधातील कारवाईला शिथिलता दिली जाईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्पष्ट केली. रेती माफियांविरोधातील धडक कारवाई थांबवावी यासाठी येथील भाजपाचे आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात बुधवारी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. रेती माफियांविरोधातील कारवाई शिथिल करावी, रेती नसल्याने बांधकामे थांबली आहे, त्यामुळे मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, मजूरच नव्हे तर ट्रक व ट्रान्सपोर्ट व्यवसायात काम करणाऱ्यांचीही रोजगाराअभावी उपासमार सुरू असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आपली मोहीम नियमानुसार आणि जनतेसाठी असल्याचे सांगितले. रेती माफिया नदी-नाल्यांमधून अनधिकृतरीत्या रेतीचा उपसा करतात, त्याचे साठे केले जातात, रेतीची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठा केलेली रेती चढ्या भावाने विकली जाते. त्यामुळे नागरिकांवर त्याचा बोझा पडतो. स्वस्तात मिळणारे रेती किती तरी जास्त पट दर आकारुन विकली जात असल्याने घर बांधणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. सामान्यांना स्वस्तात रेती मिळावी आणि शासनालाही महसूल मिळावा यासाठी आपली मोहीम आहे. तरीही तुम्हाला कारवाई हवी नसेल तर कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याने आपल्याला लेखी पत्र द्यावे आणि फोनवरून सूचना द्यावी तरच आपण ही कारवाई शिथिल करू असे सचिंद्र प्रताप सिंग यांनी स्पष्ट केले. विशेष असे आमदारांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. यावेळी नगरसेवक, कंत्राटदार आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी रेती माफियांविरुद्ध १ जूनपासून मोहीम उघडली. गेल्या आठ दिवसात रेती चोरीचे ८८ गुन्हे नोंदविले गेले. माफियांनी मोकळ्या जागा भाड्याने घेऊन, शासनाच्याच खुल्या जागेत, शेतात, जंगलात जागा मिळेल तिथे हजारो ब्रास रेतीचे साठे केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व साठे सील केले आहे. संबंधित जागा मालकावरही फौजदारी गुन्हे नोंदविले गेले. या सर्व साठ्यांचा लिलाव केला जाईल. त्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वस्तात बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी) सामान्यांना स्वस्तात रेती मिळवून देण्याचा प्रयत्न४रेती माफिया स्वस्तात लिलावात घाट घेतात, नंतर याच घाटातील रेती ट्रान्सपोर्ट व अन्य खर्च दाखवून स्वत:ची ४०० ते ५०० पट प्रॉफीट मार्जीन जोडून प्रचंड वाढीव दराने रेती विकली जाते. आज प्रति ब्रास रेतीचा दर पाच हजारावर पोहोचला आहे. वास्तविक घाटातून त्याच्या दहा टक्के रकमेतच रेती कंत्राटदाराला उपलब्ध होते. ही साखळी तोडण्यासाठी मोहीम हाती घेतली गेली. ही मोहीम थांबविण्याचे राजकीय प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. नियमानुसार चालणारी ही मोहीम थांबवा असे लेखी पत्र कुणीही कॅबिनेट मंत्री देणार नाही, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून रेती माफियांना आता ‘पळता भूई थोडी’ होणार असल्याचे दिसते.