शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

तलावातच सुरू केल्या वीटभट्ट्या

By admin | Updated: November 1, 2014 23:15 IST

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

यवतमाळ : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे नगरपरिषदेसह तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरातील धोबी घाट, भारतनगर, तलावफैल आणि पावर हाऊस या परिसराच्या मधोमध तलाव आहे. या तलावातील पाणी नागरिक दैनंदिन कामासाठी उपयोगी आणतात. धोबी बांधव याच तलावाच्या पात्रात कपडे धुवून कुटुंबाचा गाडा ओढतात. एवढेच नव्हे तर गवळीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत. जनावरांना पिण्यासाठी या तलावातील पाण्याचाच वापर होतो. असे असताना काही व्यावसायिकांनी या तलावातच वीटभट्ट्या लावण्याचा सपाटा चालविला आहे. तलावातील काळ्या मातीचा उपसा करून तो विट तयार करण्यासाठी वापरला जातो. शिवाय परिसरातील झाडांचे लाकूड तोडून वीटभट्ट्यांसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद आणि तहसील प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने आर्थिक हितसंबंधातून या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांची मजल दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तर त्यांनी तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही केले आहे. या संदर्भात नुकतेच स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन दिले. तसेच अतिक्रमण आणि वीटभट्ट्या तेथून हटविण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी सुधाकर घायघोडे, सटरा पोहे, नारायण अजमिरे, सुजीत मोरवाल, अजय मारशेट्टीवार, शंकर वैरागडे, सुभाष गौरखेड उपस्थित होते.