शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलावातच सुरू केल्या वीटभट्ट्या

By admin | Updated: November 1, 2014 23:15 IST

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

यवतमाळ : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या एका तलावातच काही व्यावसायिकांनी वीटभट्ट्या लावल्या. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे नगरपरिषदेसह तहसील प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. त्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरातील धोबी घाट, भारतनगर, तलावफैल आणि पावर हाऊस या परिसराच्या मधोमध तलाव आहे. या तलावातील पाणी नागरिक दैनंदिन कामासाठी उपयोगी आणतात. धोबी बांधव याच तलावाच्या पात्रात कपडे धुवून कुटुंबाचा गाडा ओढतात. एवढेच नव्हे तर गवळीपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत. जनावरांना पिण्यासाठी या तलावातील पाण्याचाच वापर होतो. असे असताना काही व्यावसायिकांनी या तलावातच वीटभट्ट्या लावण्याचा सपाटा चालविला आहे. तलावातील काळ्या मातीचा उपसा करून तो विट तयार करण्यासाठी वापरला जातो. शिवाय परिसरातील झाडांचे लाकूड तोडून वीटभट्ट्यांसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद आणि तहसील प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाने आर्थिक हितसंबंधातून या तक्रारींची दखल घेतली नाही. त्यामुळे या व्यावसायिकांची मजल दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तर त्यांनी तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही केले आहे. या संदर्भात नुकतेच स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन दिले. तसेच अतिक्रमण आणि वीटभट्ट्या तेथून हटविण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी सुधाकर घायघोडे, सटरा पोहे, नारायण अजमिरे, सुजीत मोरवाल, अजय मारशेट्टीवार, शंकर वैरागडे, सुभाष गौरखेड उपस्थित होते.