शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कामांचे ओझे नवशिक्यांवर

By admin | Updated: October 17, 2015 00:40 IST

कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते.

युवक ठरताहेत बळी : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय सोपविली जातात कामेयवतमाळ : कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते. मात्र विद्युत कंपनीतील कारभार यापेक्षा वेगळा आहे. याचे बळी नवयुवक ठरत आहे. कामाचा तात्पुरता अनुभव असलेल्या कंत्राटी कामगारांकडून जोखमीची कामे करून घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नवीन कामगारांचे अनेक बळी गेलेले असताना त्यातून धडा घेतला जात नाही. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर कामावर घेतले जाते. केवळ प्रमाणपत्रच त्यांचा अनुभव असतो. मानधनही अतिशय कमी दिले जाते. सहा ते सात हजार रुपये महिन्यावर त्यांचा रोजगार सुरू होतो. गरज असल्यामुळे त्यांचा जीवाशी खेळ सुरू होतो. याचेच ते बळी ठरत आहे. विद्युत खांबावर चढणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, नवीन लाईन टाकणे आदी प्रकारची कामे अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करून घेतली जावी, अशा सूचना आहे. परंतु विद्युत कंपनीच्या बहुतांश कार्यालयात प्रामुख्याने ग्रामीण भागात ही दक्षताच घेतली जात नाही. अनुभवी कर्मचारी संपूर्ण कामाची जबाबदारी मानधन तत्त्वावर ढकलून देत असल्याची ओरड आहे आणि ती खरीही असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते. जोखमीची कामे करत असताना झालेल्या थोड्याही चुकीमुळे नवीन कामगारांचे बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी बाभूळगाव येथे अशीच एक घटना घडली. विजेच्या खांबावरून अप्रशिक्षित कामगार कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. यापूर्वीही अनेक ठिकाणी घडलेल्या गंभीर घटनांबाबत विद्युत कंपनी गंभीर नाही. एकूणच विद्युत कंपनीच्या कामाचे ओझे कंत्राटी कामगारांना वाहून न्यावे लागत आहे. (वार्ताहर)कामगारांवरही कारवाई आणि शिक्षाविद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या व्यक्तीला अपघात झाल्यास कारवाईची कुऱ्हाड कनिष्ठ कामगारांवर कोसळते. वरिष्ठ अधिकारी सहीसलामत यातून सुटून जातात. अशाच काही प्रकरणात कनिष्ठ कामगारांवर निलंबनाची कारवाई प्रसंगी शिक्षाही झालेली आहे. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या लोकांना मानधनाशिवाय कुठलाही अतिरिक्त भत्ता किंवा अपघात झाल्यास भरपाई मिळत नाही. अशावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. यावर उपाय म्हणजे त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, अनुभवी लोकांच्या उपस्थितीतच कामे करण्याची सूचना द्यावी हा असल्याचे खुद्द विद्युत कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते.