शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या कामांचे ओझे नवशिक्यांवर

By admin | Updated: October 17, 2015 00:40 IST

कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते.

युवक ठरताहेत बळी : कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय सोपविली जातात कामेयवतमाळ : कुठल्याही प्रकारची जोखमीची कामे सोपविताना संबंधिताला प्रशिक्षण दिले जाते. अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली त्याला काम करण्याची सूचना केली जाते. मात्र विद्युत कंपनीतील कारभार यापेक्षा वेगळा आहे. याचे बळी नवयुवक ठरत आहे. कामाचा तात्पुरता अनुभव असलेल्या कंत्राटी कामगारांकडून जोखमीची कामे करून घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात नवीन कामगारांचे अनेक बळी गेलेले असताना त्यातून धडा घेतला जात नाही. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर कामावर घेतले जाते. केवळ प्रमाणपत्रच त्यांचा अनुभव असतो. मानधनही अतिशय कमी दिले जाते. सहा ते सात हजार रुपये महिन्यावर त्यांचा रोजगार सुरू होतो. गरज असल्यामुळे त्यांचा जीवाशी खेळ सुरू होतो. याचेच ते बळी ठरत आहे. विद्युत खांबावर चढणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, नवीन लाईन टाकणे आदी प्रकारची कामे अधिकारी किंवा वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करून घेतली जावी, अशा सूचना आहे. परंतु विद्युत कंपनीच्या बहुतांश कार्यालयात प्रामुख्याने ग्रामीण भागात ही दक्षताच घेतली जात नाही. अनुभवी कर्मचारी संपूर्ण कामाची जबाबदारी मानधन तत्त्वावर ढकलून देत असल्याची ओरड आहे आणि ती खरीही असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास येते. जोखमीची कामे करत असताना झालेल्या थोड्याही चुकीमुळे नवीन कामगारांचे बळी गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गुरुवारी बाभूळगाव येथे अशीच एक घटना घडली. विजेच्या खांबावरून अप्रशिक्षित कामगार कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. यापूर्वीही अनेक ठिकाणी घडलेल्या गंभीर घटनांबाबत विद्युत कंपनी गंभीर नाही. एकूणच विद्युत कंपनीच्या कामाचे ओझे कंत्राटी कामगारांना वाहून न्यावे लागत आहे. (वार्ताहर)कामगारांवरही कारवाई आणि शिक्षाविद्युत कंपनीत मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या व्यक्तीला अपघात झाल्यास कारवाईची कुऱ्हाड कनिष्ठ कामगारांवर कोसळते. वरिष्ठ अधिकारी सहीसलामत यातून सुटून जातात. अशाच काही प्रकरणात कनिष्ठ कामगारांवर निलंबनाची कारवाई प्रसंगी शिक्षाही झालेली आहे. मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या लोकांना मानधनाशिवाय कुठलाही अतिरिक्त भत्ता किंवा अपघात झाल्यास भरपाई मिळत नाही. अशावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. यावर उपाय म्हणजे त्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे, अनुभवी लोकांच्या उपस्थितीतच कामे करण्याची सूचना द्यावी हा असल्याचे खुद्द विद्युत कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते.