शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘बंडोबां’मुळे उमेदवार अडचणीत

By admin | Updated: February 13, 2017 00:50 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध बंडखोरी करून उभे

कारवाईचा आसूड : काँग्रेस, भाजप, शिवसेना बजावणार नोटीस यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरूद्ध बंडखोरी करून उभे ठाकलेल्यांवर सर्वच पक्ष कारवाईचा आसूड ओढणार आहे. या बंडखोरांमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार अडचणीत सापडल्याने कारवाईचा फास आवळला जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ५५, तर दुसऱ्या टप्प्यात सहा गटांची निवडणूक होणार आहे. सोबतच पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या ११०, तर दुसऱ्या टप्प्यात १२ गणांची निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १६, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारीला होणार आहे. भाजपाने जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी ६१, शिवसेना ६०, काँग्रेसने ५७, तर राष्ट्रवादीने ४५ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविले आहे. या चार प्रमुख पक्षांशिवाय काही गटांमध्ये मनसे, बसपा, गोंगपाचे उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे उमेदवारही मैदानात आहे. याशिवाय उमेदवारी न मिळाल्याने काही पक्षांचे बंडखोरही रिंगणात कायम आहे. पक्ष नेत्यांनी बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात काही ठिकाणी यशही आले. मात्र काही गट आणि गणांमधील बंडखोरांनी पक्ष नेत्यांच्या समजुतीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. आता हेच बंडखोर संबंधित पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना अडचणीचे ठरू लागले आहेत. बंडखोर, इतर लहान पक्ष आणि स्थानिक आघाड्यांमुळे काही पक्षांचे अधिकृत उमेदवार संकटात सापडले आहे. अशा बंडखोर उमेदवारांमुळे त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. असे उमेदवार निवडून जरी आले नाही, तरी पक्षाचा अधिकृत उमेदवार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता पक्षांनी बंडखोर उमेदवारांविरूद्ध कारवाईचा आसूड उगारण्याची तयारी सुरू केली आहे. या बंडखोरांना आता पक्षातून निष्कासीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (शहर प्रतिनिधी) बंडखोर विजयी झाल्यास पेच काही पक्षांचे तगडे बंडखोर निवडणुकीत विजयी झाल्यास संंबंधित पक्षांसमोर मात्र नंतर पेच निर्माण होणार आहे. सत्ता स्थापनेसाठी एक-दोन सदस्य कमी पडल्यास याच बंडखोरांवर संबंधित पक्षांची मदार अवलंबून राहणार आहे. त्यामुळे कारवाई करतानाही या पक्षांना दूरचा विचार करावा लागणार आहे. यातूनच मतदान चार दिवसांवर येऊन ठेपले असतानाही कोणत्याच पक्षाने कारवाईचा बडगा उगारला नसावा, अशी चर्चा आहे.