शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाने द्यावे लागतेय पिकाला पाणी

By admin | Updated: July 19, 2015 02:38 IST

यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला.

नेर तालुक्यात प्रशासन ढिम्म : निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांच्या दैनेची कुणी घेणार का दखल ?नेर : यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला. त्यामुळे सध्या अंकुरलेल्या पिकांना गुंडाने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भारतीय कृषी व्यवस्थेची रोगट अवस्था पूर्वापार आहे. सततच्या राजकीय बदलांच्या वरवंट्याखाली रगडा होतोय तो शेतकऱ्यांच्याच. निसर्गाच्या अनियमितपणाच्या जात्यामध्येही तोच भरडला जातोय. ऋतूबदलाचे विपरित परिणाम शेतीवर झाले. उन्हाळ्यात पाऊस अन् पावसाळ्यात उन्हाळा अशी स्थिती झाली. फक्त मृगात काही दिवस पाऊस पडला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पेरणीसाठी त्याला कधी बँकेचे तर कधी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्र तर कोरडेच गेले. पाण्यासाठी आकाशाकडे पाहात त्याच्या डोळ्यात पाणी तर आलेच; पण सोबतच तोंडचे पाणीही पळाले. दुबार पेरणीची त्याला चिंता वाटू लागली. बँकांनी तर शेतकऱ्यांचे पाशच आवळले. कारण मागील वर्षाचे कर्ज फेडले नाही व कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. बँकांनी कर्ज दिले नाही. शेतऱ्यांवर विदारक परिस्थिती ओढवली. दुबार पेरणीसाठी त्याला पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. शेतकरी कुटुंबातील स्त्रीची वेदना ही काळजाच्या चिंध्या करणारी आहे. अस्मानी सुलतानी गर्तेत शेतकरी वर्ग सैरभैर झाला आहे. ग्लोबल वार्मिंगबरोबरच आर्थिक तंगीत तो होरपळू लागला.दुबार पेरणी झाल्यावर नवीन अंकुर जमिनीवर तरारू लागले. पण दुपारचा सूर्य आग ओकू लागल्यामुळे नाजूक कोंब माना खाली टाकू लागले. उन्हाळ्यात तापलं नाही एवढे उन जुलैमध्ये आहे. उन्हामुळे पिके करपू लागली. हे पीक कसेतरी जगवावे म्हणून शेतकरी गुंडाने नवीन अंकुरांना पाणी देऊ लागला आहे. मात्र, ही तजवीजही किती दिवस जमणार आहे? पेरणीच्या वेळात ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून अधिक महिना आला. पुण्य पदरी पडावे म्हणून जावयांसाठी कपडे, भांडी व फराळाची मेजवाणीची तजवीज कशी तरी करावी लागली. अधिक महिना भाग्याचा ठरण्याऐवजी तो दुर्भाग्याचा ठरला. कारण संपूर्ण अधिक महिना पावसाविना कोरडाच गेला.कास्तकार अधिकच हतबल झाला. कपाळाला हात लावून मोठ्या आशेने शेतकरी आकाशाकडे पाहात आहेत. ज्या जमिनीमुळे त्याला इज्जत मिळत आहे, तीच आता त्याच्या पायाखालून निसटत आहे. कारण रोगट कृषी व्यवस्थेचा जुनाट रोग आता एवढा विकोपाला गेला आहे की, तो तात्पुरत्या उपचाराने बरा होणारा नाही. (तालुका प्रतिनिधी)