शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

गुंडाने द्यावे लागतेय पिकाला पाणी

By admin | Updated: July 19, 2015 02:38 IST

यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला.

नेर तालुक्यात प्रशासन ढिम्म : निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांच्या दैनेची कुणी घेणार का दखल ?नेर : यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला. त्यामुळे सध्या अंकुरलेल्या पिकांना गुंडाने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भारतीय कृषी व्यवस्थेची रोगट अवस्था पूर्वापार आहे. सततच्या राजकीय बदलांच्या वरवंट्याखाली रगडा होतोय तो शेतकऱ्यांच्याच. निसर्गाच्या अनियमितपणाच्या जात्यामध्येही तोच भरडला जातोय. ऋतूबदलाचे विपरित परिणाम शेतीवर झाले. उन्हाळ्यात पाऊस अन् पावसाळ्यात उन्हाळा अशी स्थिती झाली. फक्त मृगात काही दिवस पाऊस पडला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पेरणीसाठी त्याला कधी बँकेचे तर कधी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्र तर कोरडेच गेले. पाण्यासाठी आकाशाकडे पाहात त्याच्या डोळ्यात पाणी तर आलेच; पण सोबतच तोंडचे पाणीही पळाले. दुबार पेरणीची त्याला चिंता वाटू लागली. बँकांनी तर शेतकऱ्यांचे पाशच आवळले. कारण मागील वर्षाचे कर्ज फेडले नाही व कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. बँकांनी कर्ज दिले नाही. शेतऱ्यांवर विदारक परिस्थिती ओढवली. दुबार पेरणीसाठी त्याला पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. शेतकरी कुटुंबातील स्त्रीची वेदना ही काळजाच्या चिंध्या करणारी आहे. अस्मानी सुलतानी गर्तेत शेतकरी वर्ग सैरभैर झाला आहे. ग्लोबल वार्मिंगबरोबरच आर्थिक तंगीत तो होरपळू लागला.दुबार पेरणी झाल्यावर नवीन अंकुर जमिनीवर तरारू लागले. पण दुपारचा सूर्य आग ओकू लागल्यामुळे नाजूक कोंब माना खाली टाकू लागले. उन्हाळ्यात तापलं नाही एवढे उन जुलैमध्ये आहे. उन्हामुळे पिके करपू लागली. हे पीक कसेतरी जगवावे म्हणून शेतकरी गुंडाने नवीन अंकुरांना पाणी देऊ लागला आहे. मात्र, ही तजवीजही किती दिवस जमणार आहे? पेरणीच्या वेळात ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून अधिक महिना आला. पुण्य पदरी पडावे म्हणून जावयांसाठी कपडे, भांडी व फराळाची मेजवाणीची तजवीज कशी तरी करावी लागली. अधिक महिना भाग्याचा ठरण्याऐवजी तो दुर्भाग्याचा ठरला. कारण संपूर्ण अधिक महिना पावसाविना कोरडाच गेला.कास्तकार अधिकच हतबल झाला. कपाळाला हात लावून मोठ्या आशेने शेतकरी आकाशाकडे पाहात आहेत. ज्या जमिनीमुळे त्याला इज्जत मिळत आहे, तीच आता त्याच्या पायाखालून निसटत आहे. कारण रोगट कृषी व्यवस्थेचा जुनाट रोग आता एवढा विकोपाला गेला आहे की, तो तात्पुरत्या उपचाराने बरा होणारा नाही. (तालुका प्रतिनिधी)