शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गुंडाने द्यावे लागतेय पिकाला पाणी

By admin | Updated: July 19, 2015 02:38 IST

यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला.

नेर तालुक्यात प्रशासन ढिम्म : निसर्गाचा लहरीपणा, शेतकऱ्यांच्या दैनेची कुणी घेणार का दखल ?नेर : यंदा पावसाने शेतकऱ्यांची परीक्षाच पाहणे सुरू केले आहे. मार्च, एप्रिल महिन्यात पाऊस बरसला अन् आता जून-जुलै कोरडाच चालला. त्यामुळे सध्या अंकुरलेल्या पिकांना गुंडाने पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.भारतीय कृषी व्यवस्थेची रोगट अवस्था पूर्वापार आहे. सततच्या राजकीय बदलांच्या वरवंट्याखाली रगडा होतोय तो शेतकऱ्यांच्याच. निसर्गाच्या अनियमितपणाच्या जात्यामध्येही तोच भरडला जातोय. ऋतूबदलाचे विपरित परिणाम शेतीवर झाले. उन्हाळ्यात पाऊस अन् पावसाळ्यात उन्हाळा अशी स्थिती झाली. फक्त मृगात काही दिवस पाऊस पडला. या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. या पेरणीसाठी त्याला कधी बँकेचे तर कधी खाजगी सावकाराचे उंबरठे झिजवावे लागले. आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्र तर कोरडेच गेले. पाण्यासाठी आकाशाकडे पाहात त्याच्या डोळ्यात पाणी तर आलेच; पण सोबतच तोंडचे पाणीही पळाले. दुबार पेरणीची त्याला चिंता वाटू लागली. बँकांनी तर शेतकऱ्यांचे पाशच आवळले. कारण मागील वर्षाचे कर्ज फेडले नाही व कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. बँकांनी कर्ज दिले नाही. शेतऱ्यांवर विदारक परिस्थिती ओढवली. दुबार पेरणीसाठी त्याला पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. शेतकरी कुटुंबातील स्त्रीची वेदना ही काळजाच्या चिंध्या करणारी आहे. अस्मानी सुलतानी गर्तेत शेतकरी वर्ग सैरभैर झाला आहे. ग्लोबल वार्मिंगबरोबरच आर्थिक तंगीत तो होरपळू लागला.दुबार पेरणी झाल्यावर नवीन अंकुर जमिनीवर तरारू लागले. पण दुपारचा सूर्य आग ओकू लागल्यामुळे नाजूक कोंब माना खाली टाकू लागले. उन्हाळ्यात तापलं नाही एवढे उन जुलैमध्ये आहे. उन्हामुळे पिके करपू लागली. हे पीक कसेतरी जगवावे म्हणून शेतकरी गुंडाने नवीन अंकुरांना पाणी देऊ लागला आहे. मात्र, ही तजवीजही किती दिवस जमणार आहे? पेरणीच्या वेळात ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणून अधिक महिना आला. पुण्य पदरी पडावे म्हणून जावयांसाठी कपडे, भांडी व फराळाची मेजवाणीची तजवीज कशी तरी करावी लागली. अधिक महिना भाग्याचा ठरण्याऐवजी तो दुर्भाग्याचा ठरला. कारण संपूर्ण अधिक महिना पावसाविना कोरडाच गेला.कास्तकार अधिकच हतबल झाला. कपाळाला हात लावून मोठ्या आशेने शेतकरी आकाशाकडे पाहात आहेत. ज्या जमिनीमुळे त्याला इज्जत मिळत आहे, तीच आता त्याच्या पायाखालून निसटत आहे. कारण रोगट कृषी व्यवस्थेचा जुनाट रोग आता एवढा विकोपाला गेला आहे की, तो तात्पुरत्या उपचाराने बरा होणारा नाही. (तालुका प्रतिनिधी)