शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

दुष्काळाने बैलबाजार पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 9:33 PM

दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

ठळक मुद्देभाव अर्ध्यावर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी आले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुष्काळाने संपूर्ण राज्य होरपळून निघत आहे. अशा स्थितीत बळीराजा आपल्या जीवाभावाच्या बैलजोड्या विक्रीला काढत आहे. बैलाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. तर खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. शेतकऱ्यांऐवजी थेट मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारीच यवतमाळात येऊन चक्क अर्ध्या किमतीत बैलजोड्या विकत घेत आहेत.खरीप हंगाम संपल्यावरही शेतकऱ्यांच्या हाती पैसे आले नाही. शेतकऱ्यांनी उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्यासाठी खासगी सावकारांनी तगादा लावला. यातून सुटका व्हावी म्हणून शेतकºयांनी जनावरे विक्रीला काढली आहेत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीला आली आहे. त्या तुलनेत खरेदी करणारे मात्र बाजारात नाही. यामुळे बैलबाजार कोसळला आहे.बैलांची खरेदी करणारे व्यापारी आणि दलालच बाजारात दिसत आहे. ही मंडळी बैलाची अत्यल्प दरात मागणी करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील व्यापारी जिल्ह्यात येऊन बैलांची खरेदी करताना दिसत आहे. अडत्यामार्फत खरेदी केली जात आहे. बाजारात दर पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. ५० ते ६० हजार रूपयापर्यंत असलेली बैलजोडी ३० ते ३५ हजारापर्यंत मागितली जात आहे. यामुळे शेतकरी या बाजारातून दुसऱ्या बाजारात आणि तेथून आणखी तिसऱ्या बाजारात बैल घेऊन पायपीट करीत आहे. मात्र कुठेही भाव मिळत नाही.२०० पैकी १७० बैलजोड्या परतबैलबाजारात भाव नसल्याने शेतकरी बैल न विकता परत नेणेच पंसत करीत आहे. दुसऱ्या बाजाराकडे मोर्चा वळवत आहे. रविवारी यवतमाळच्या बैलबाजारात २०० जोड्यांपैकी केवळ ३० जोड्यांचीच विक्री झाली. त्याचा सर्वाधिक दर ३५ हजार रूपये राहिला. अपेक्षेपेक्षा हे दर निम्मे होते. शेतकऱ्यांना बैलजोडी ने-आण करण्याचाच मोठा खर्च करावा लागला.शेतकरी म्हणतात, पर्यायच नाहीउधारी, उसनवारी, सावकाराचे पैसे या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैलजोडी विक्रीचा निर्णय घेतला. पण आता पुढच्या वर्षी पाहू. यंदा भावच नाही.- अशोक मेश्राम, वाढोणा बाजारबैलजोडीला एक लाख रूपयाचा भाव ठेवला. बाजारात इतकी सुपर जोडी शोधून सापडत नाही. पण ५० हजारांच्या आताच मागत आहे. मी बैलजोडी न विकताच परत जाणार आहे. अडचणीत व्यापारी पाडून भाव मागत आहेत. - महादेव सोळंके, कळंबबैलजोडीला भाव नसले तरी दुधाळ जनावरांच्या किमती चांगल्या आहे. त्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे. दुष्काळी स्थितीने बाजारात चढउतार होत आहे. मात्र पर्याय नसल्याने जनावरे विकावीच लागत आहे. - दत्ता पजगाडे, चाणी

टॅग्स :Marketबाजार