शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मुहूर्तावर सराफा बाजारपेठ उजळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

साडेतीन शुभमुहूर्तापैकी धनत्रयोदशीचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. यावर्षी सोन्याचे दर घसरले आहे. त्यामुळेच  यवतमाळच्या बाजारपेठेत मंगळवारी विक्रमी गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये सोन्याच्या खरेदीला पहिले प्राधान्य असते. यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच ॲडव्हॉन्स बुकींग करुन ठेवली होती. तर अनेक ग्राहकांनी गतवर्षीचा सोन्याचा दर आणि यावर्षी असलेल्या सोन्याच्या दरातील तफावतीमुळे सोने खरेदीचा निर्णय घेतला. गतवर्षी एका तोळ्याला ५२ हजार रुपयांचा दर होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील दोन दिवाळीला कोरोनाचे ग्रहण होते. यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने प्रशासनाने बहुतांश निर्बंध हटविले आहे. त्यातच मागील वर्षीच्या तुलनेत साधारण चार हजाराने सोन्याचे दर यंदा कमी झालेले आहे. परिणामी मंगळवारी अनेकांनी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठत सोने खरेदी केली. ग्राहकांमुळे दोन वर्षात प्रथमच सराफा व्यापारपेठ गर्दीने फुलल्याचे चित्र होते. साडेतीन शुभमुहूर्तापैकी धनत्रयोदशीचा मुहूर्त सर्वात शुभ मानला जातो. यावर्षी सोन्याचे दर घसरले आहे. त्यामुळेच  यवतमाळच्या बाजारपेठेत मंगळवारी विक्रमी गर्दी होती. धनत्रयोदशीच्या खरेदीमध्ये सोन्याच्या खरेदीला पहिले प्राधान्य असते. यासाठी अनेक ग्राहकांनी आधीच ॲडव्हॉन्स बुकींग करुन ठेवली होती. तर अनेक ग्राहकांनी गतवर्षीचा सोन्याचा दर आणि यावर्षी असलेल्या सोन्याच्या दरातील तफावतीमुळे सोने खरेदीचा निर्णय घेतला. गतवर्षी एका तोळ्याला ५२ हजार रुपयांचा दर होता. यावर्षी हा दर ४८ हजार ४०० रुपये ते ४८ हजार ७०० रुपये असा पाहायला मिळाला. एका तोळ्यामागे किमान चार हजार रुपयांची तफावत यावर्षी सोन्यामध्ये आहे. याशिवाय गुंतवणूक म्हणूनही ग्राहक आता सोन्याकडे वळलेले आहेत. त्यामुळेच ग्राहकांनी दीर्घ कालीन गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले.  यवतमाळच्या बाजारपेठेला मंगळवारी सुटी असते. यावर्षी धनत्रयोदशीला मंगळवार होता. याच दिवशी मोठी खरेदी होण्याचा अंदाज असल्याने बाजारपेठ खुली ठेवण्यात आली होती. याच संधीचे ग्राहकांनी सोने केले. अगदी सकाळपासूनच सराफा बाजारपेठेतील प्रत्येक दुकानात तुडुंब गर्दी झाली होती.  गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सराफा बाजारात सोन्याची दुप्पट विक्री झाली. 

मागणी असूनही कारची डिलिव्हरी थांबली - कोरोना प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यामुळेच धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी वाहनांची बुकिंग केली होती. जिल्ह्यात ५०० चारचाकी वाहनांची बुकिंग नोंदविण्यात आली आहे. यातील अडीचशे चारचाकी वाहने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात उपलब्ध होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात सिलीकाॅन चीपअभावी ७० चारचाकी वाहनेच जिल्ह्यात पोहोचली आहे. यामुळे शुभमुहूर्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना निराशेचा सामना करावा लागला. आता लक्ष्मीपूजन, पाडव्याला तरी वाहने पोहोचतील, अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. 

 

टॅग्स :jewelleryदागिनेMarketबाजार