शहरं
Join us  
Trending Stories
1
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
4
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
5
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
6
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
7
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
8
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
9
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
10
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
11
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
12
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
13
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
14
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
15
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
16
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
17
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
18
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
19
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
20
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 

शिक्षक-विद्यार्थी आणि पालक संवाद सेतू बांधा

By admin | Updated: December 14, 2015 02:36 IST

संपूर्ण देशभरात शिक्षणाची संक्रमण स्थिती निर्माण झाली आहे. सुविधा भरपूर आहेत, मात्र शिक्षक आणि समाज दूर जात आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन : प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अधिवेशनयवतमाळ : संपूर्ण देशभरात शिक्षणाची संक्रमण स्थिती निर्माण झाली आहे. सुविधा भरपूर आहेत, मात्र शिक्षक आणि समाज दूर जात आहे. यावर चिंतन करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मजबुत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक असा सेतू बांधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. ते रविवारी यवतमाळ येथे आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे होत्या. शिक्षण सभापती नरेन्द्र ठाकरे, संघटनेचे अध्यक्ष राजुदास जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, कार्याध्यक्ष गौतम कांबळे, विलास भोयर, जिल्हा समन्वयक अब्दुल जलील, सरचिटणीस विनोद गोडे, राज्य प्रतिनीधी नामदेव महल्ले, पदविधर प्रमुख शरद इंगळे, महिला प्रमुख सुरेखा टोणे, बि.यू. राऊत, शिक्षण सेवक आसाराम चव्हाण उपस्थित होते.पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, हे अधिवेशन केवळ समस्या मांडण्यासाठीच नव्हे तर गुणवत्ता सुधारण्यासाठी घेण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांनी अध्यक्षांचे कौतुक केले. विविध प्रयोगासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख रूपये दिले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भविष्यात विद्यार्थी आणि गुणवत्ता शाळेसाठी महत्वाची राहणार आहे. जिल्हा परिषद शाळेतून आधुनिक शिक्षण मिळणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीला आपली शाळा माझी शाळा वाटली पाहिज, असेही ते म्हणाले. ज्यांच्यासाठी करतोय त्यांचा सहभाग घेतला पाहिजे अध्यक्षांच्या शाळेला आयएसओ नामांकन मिळाले, ते मर्यादित राहायला नको. संघटनेच्या प्रत्येक मुख्याध्यापक सदस्यांनी त्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषण करताना खासदार भावना गवळी म्हणाल्या, शिक्षक जिवंत आणि जाणता असला पाहिजे. तरच चांगले विद्यार्थी घडतील. आज २७ प्रकारची कामे शिक्षकाला दिली आहेत. चांगली गुणवत्ता गरजेची आहे. बुध्दीजीवी वर्गाने समाजाला घडविण्याचे काम केले आहे. आपले प्रश्न केंद्रात आणि राज्यात सोडविण्यात येतील. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असेही त्या म्हणाल्या. संगणकाअभावी सरल आणि इतर कामे अवघड झाली आहेत. त्यासाठी खासदार निधीतून पंचायत समितीमध्ये संगणक दिले जातील. मात्र निकष पाहिले जातील तपासले जातील. यावेळी त्यांनी सीईओंना पंचायत समितीमधून बिलाची प्रक्रीया करण्याच्या सुचनाही दिल्या. प्रास्ताविकात संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेमध्ये राजुदास जाधव यांनी, आमची संघटना प्रथम शाळेचे काम आणि नंतरच संघटनेचे काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी चंद्रबोधी घायवटे, मृणालिनी दहिकर, विनोद गोडे आदींसह इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. या अधिवेशनाला संपूर्ण जिल्हाभरातून हजारो शिक्षकांची आवर्जून उपस्थिती होती. (शहर वार्ताहर)जिल्हा नियोजन समितीमधून इलेक्ट्रीक बिलया अधिवेशनात इलेक्ट्रीक बिलाचा प्रश्न पुढे आला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा नियोजन समितीमधून इलेक्ट्रीक बिलाचे पैसे देण्याची घोषणा केली. दर्जदार शिक्षण हा अजेंडा घेऊन आम्ही चालत आहोत. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्यात यावी, दर महिन्याच्या १ तारखेला वेतन मिळावे, खिचडीसह अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी आदी मागण्यांवर राजूदास जाधव यांनी प्रकाश टाकला.