शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

बजेट २० कोटींचे, मजूर मात्र मिळेना

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा

रोजगार हमी योजना : मजूर उपलब्ध झाल्यास ५९ कोटींची कामेयवतमाळ : मजुरांच्या हातांना गावातच काम उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला मजुरांनीच नख लावणे सुरू केले आहे. यावर्षी जिल्हा प्रशासनाने २० कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन केले असले तरी प्रशासनालाही मजूर मिळण्याबाबत शंकाच आहे. मजूर उपलब्ध झाल्यास या योजनेतून जिल्ह्यात ५९ कोटी रुपयांची कामे होण्याचा अंदाज आहे. मात्र मजूर या कामावर राबण्यास गेल्या कित्येक वर्षांपासून नाखूष आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे, विकास कामांना गती यावी यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विकासात्मक कामे केली जातात. त्यामध्ये सिंचन विहीर, पांदण रस्ते, सिमेंट रस्ते, बांध बंधिस्ती, जमीन सपाटीकरण या सारख्या कामांचा समावेश असतो. जिल्हा प्रशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नियोजन करते. परंतु या कामावर मजूरच येत नाही. परिणामी ही कामे कंत्राटदार यंत्राच्या सहाय्याने करतात आणि मजुरांची नावे रजिस्टरवर चढवितात. यातून मोठ्या प्रमाणात गैरप्रकारही उघडकीस आला. अनेक मृतांची नावे मस्टरवर चढविल्या गेली. त्यांच्या नावावरील मजुरी परस्पर लाटल्या गेली. वनविभागात झालेल्या रोहयोच्या कामाचे तर मोठे गौडबंगाल आहे. उच्चस्तरीय चौकशी होऊन अनेकांना निलंबितही व्हावे लागले. जिल्ह्यातील आठ लाख मजुरांना काम उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. गावपातळीवर कृती आराखडा तयार करण्यात आला. या कामाला ग्रामसभेची मंजुरी देण्यात आली. २० कोटी रुपयानची आर्थिक तरतूद यासाठी करण्यात आली. प्रत्येक मजुराला १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमीही देण्यात आली. मागेल त्याला काम उपलब्ध व्हावे अशी या योजनेत तरतूद आहे. यामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांचाही समावेश असतो. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १५ हजार वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे सूचविली आहे. १०० दिवस ३ हजार ३२७ मजूर कामावर राबल्यास ५९ कोटी ८९ लाख रुपये लागतील, असा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने कामही उपलब्ध केले आहे. परंतु प्रशासनाला मजुराचीच धास्ती असते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर असले तरी रोजगार हमीच्या कामावर जाण्याची त्यांची इच्छा नसते. अनेकदा मजूर मंडळी शहराकडे धाव घेतील, परंतु रोजगार हमीच्या कामावर जाणार नाही, अशी अवस्था आहे. (शहर वार्ताहर)