शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:31 IST

पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उधारीच्या औषधीतून सुरू आहे शेतकºयांची लूट

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.संबधित सर्वच कंपनीकडून बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा केला जातो. यासाठी मोठ-मोठ्या जाहिराती करून शेतकºयांना आकर्षित केले जाते. यावर विश्वास ठेऊन अनेक शेतकºयांनी बीटी कपाशी लावण्यास सुरुवात केली. परंतु यावर्षी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी केंद्र दुकानदारांसह अनेकांचे मार्गदर्शन घेत आहे. यातूनच अळीचा नायनाट करण्यासाठी विविध औषधांची फवारणी केली जाते. औषधी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दुकानदारही मनमानी भावाने औषधी विकून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. एवढेच नाही तर उधारीने औषध देऊन ते दीडपटीने वसूल केले जाते. या प्रकारामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे, असे असले तरी फवारणीला अळी दादच देत नसल्याने शेतकºयांच्या काळजीत आणखीच भर पडली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.कंपनीवर ठोकणार दावाबीटी कंपन्यांनी अळी येणार नाही, अशा जाहिराती केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेऊन माझ्यासह अनेकांनी कपाशीची लागवड केली असल्याचे शेतकरी आनंदराव जगताप ‘लोकमत’सोबत बोलताना म्हणाले. आता अळींनी कपाशीवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर फवारणीलाही ही अळी मानत नाही. त्यामुळे या विषयावर अनेक शेतकरी एकत्र येत कंपनीविरोधात दावाकरणार असल्याची माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतीशिल शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.बीटीवर अळ्यांनी आक्रमण केले, ही बाब सत्य आहे. परंतु यासाठी शेतकरीही तेवढेच जबाबदार आहे. कपाशी लागवडीच्या नियमानुसार शेतकरी बीटीची लावगड करीत नाही. रेफुजी लागवडीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अळीचा पादुर्भाव वाढला आहे.- किशोर अंबरकरकृषी अधिकारी,पंचायत समिती कळंब