शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

बीटी कपाशीवरही अळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:31 IST

पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उधारीच्या औषधीतून सुरू आहे शेतकºयांची लूट

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : पूर्वी बीटी कपाशीच्या व्हेरायटीवर अळ्यांचा पादुर्भाव होत नसे. परंतु तालुक्यात यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात बीटी कपाशीवरही अळ्यांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.संबधित सर्वच कंपनीकडून बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा केला जातो. यासाठी मोठ-मोठ्या जाहिराती करून शेतकºयांना आकर्षित केले जाते. यावर विश्वास ठेऊन अनेक शेतकºयांनी बीटी कपाशी लावण्यास सुरुवात केली. परंतु यावर्षी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात अळ्यांनी आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पूर्णत: धास्तावला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकरी कृषी केंद्र दुकानदारांसह अनेकांचे मार्गदर्शन घेत आहे. यातूनच अळीचा नायनाट करण्यासाठी विविध औषधांची फवारणी केली जाते. औषधी खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. दुकानदारही मनमानी भावाने औषधी विकून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. एवढेच नाही तर उधारीने औषध देऊन ते दीडपटीने वसूल केले जाते. या प्रकारामुळे फवारणीच्या खर्चातही वाढ झाली आहे, असे असले तरी फवारणीला अळी दादच देत नसल्याने शेतकºयांच्या काळजीत आणखीच भर पडली आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.कंपनीवर ठोकणार दावाबीटी कंपन्यांनी अळी येणार नाही, अशा जाहिराती केल्या होत्या. त्यावर विश्वास ठेऊन माझ्यासह अनेकांनी कपाशीची लागवड केली असल्याचे शेतकरी आनंदराव जगताप ‘लोकमत’सोबत बोलताना म्हणाले. आता अळींनी कपाशीवर आक्रमण केले आहे. एवढेच नाही तर फवारणीलाही ही अळी मानत नाही. त्यामुळे या विषयावर अनेक शेतकरी एकत्र येत कंपनीविरोधात दावाकरणार असल्याची माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतीशिल शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.बीटीवर अळ्यांनी आक्रमण केले, ही बाब सत्य आहे. परंतु यासाठी शेतकरीही तेवढेच जबाबदार आहे. कपाशी लागवडीच्या नियमानुसार शेतकरी बीटीची लावगड करीत नाही. रेफुजी लागवडीकडे ते दुर्लक्ष करतात. त्यामुळेच अळीचा पादुर्भाव वाढला आहे.- किशोर अंबरकरकृषी अधिकारी,पंचायत समिती कळंब