शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

बीएसएनएलचे एक्सचेंज डाऊन

By admin | Updated: October 11, 2014 02:12 IST

निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला.

यवतमाळ : निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला. जिल्हा निवडणूक विभाग, बँका, शासकीय विभागांसह सर्वसामान्यांनाही याचा फटका बसला. कोणाचेच फोन लागत नसल्याने नेमके काय झाले हेही कळायला मार्ग नव्हता. बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणामुळे हे संकट ओढवल्याची माहिती पुढे आली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचे येथील एक्सचेंज गुरुवारी सकाळी डाऊन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील सेवा प्रभावित झाली. कुणाचेही फोन लागत नव्हते की इंटरनेट सेवाही सुरू होत नव्हती. बँकांच्या व्यवहारावरही त्याचा मोठा फटका बसला. लिंक फेल झाल्याचे कारण सांगत बँक कर्मचारी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी) बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाचा फटका यवतमाळ येथील बीएसएनएलच्या पॉवर प्लँट विभागातील बॅटऱ्या कमजोर झाल्या आहे. त्यामुळे बंगलुरूवरून बॅटऱ्यांचे सेट बोलाविण्यात आले. परंतु बीएसएनएलमधील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या बॅटऱ्या वेळेत बसविण्यात आल्या नाही. त्यासाठी लागणाऱ्या तांब्याच्या पट्ट्याच गायब असल्याचे आढळून आले. वास्तविक जुन्या खराब झालेल्या बॅटऱ्यांच्या पट्ट्या वापरता येऊ शकल्या असत्या. परंतु तसे करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. वेळेवर तांब्यांच्या पट्ट्यांसाठी पैसे मंजूर करण्यात येऊन केवळ एक सेट लावण्यात आला. उर्वरित बटऱ्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहे आणि त्याचाच फटका जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना बसला.