शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

बीएसएनएलचे एक्सचेंज डाऊन

By admin | Updated: October 11, 2014 02:12 IST

निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला.

यवतमाळ : निवडणुकीचे वातावरण आणि सणासुदीच्या दिवसात बीएसएनएलची दूरध्वनी, मोबाईल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा तब्बल २४ तास ठप्प झाल्याने एकच हाहाकार उडाला. जिल्हा निवडणूक विभाग, बँका, शासकीय विभागांसह सर्वसामान्यांनाही याचा फटका बसला. कोणाचेच फोन लागत नसल्याने नेमके काय झाले हेही कळायला मार्ग नव्हता. बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणामुळे हे संकट ओढवल्याची माहिती पुढे आली आहे. भारत संचार निगम लिमिटेडचे येथील एक्सचेंज गुरुवारी सकाळी डाऊन झाले. त्यामुळे जिल्हाभरातील सेवा प्रभावित झाली. कुणाचेही फोन लागत नव्हते की इंटरनेट सेवाही सुरू होत नव्हती. बँकांच्या व्यवहारावरही त्याचा मोठा फटका बसला. लिंक फेल झाल्याचे कारण सांगत बँक कर्मचारी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करीत होते. (प्रतिनिधी) बीएसएनएलच्या वेळकाढू धोरणाचा फटका यवतमाळ येथील बीएसएनएलच्या पॉवर प्लँट विभागातील बॅटऱ्या कमजोर झाल्या आहे. त्यामुळे बंगलुरूवरून बॅटऱ्यांचे सेट बोलाविण्यात आले. परंतु बीएसएनएलमधील अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे या बॅटऱ्या वेळेत बसविण्यात आल्या नाही. त्यासाठी लागणाऱ्या तांब्याच्या पट्ट्याच गायब असल्याचे आढळून आले. वास्तविक जुन्या खराब झालेल्या बॅटऱ्यांच्या पट्ट्या वापरता येऊ शकल्या असत्या. परंतु तसे करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. वेळेवर तांब्यांच्या पट्ट्यांसाठी पैसे मंजूर करण्यात येऊन केवळ एक सेट लावण्यात आला. उर्वरित बटऱ्या चार महिन्यांपासून धूळ खात पडल्या आहे आणि त्याचाच फटका जिल्ह्यातील शेकडो ग्राहकांना बसला.