शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार....

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : वणी उपविभागात कापूस उत्पादकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार संस्थांमधील दलाल शेतकऱ्यांकडून एक ते दीड टक्के दलाली वसूल करीत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.अगोदरच कपाशीचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात आता दलालीचा बोझा सहन करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. १०० रुपयांमागे एक ते दीड टक्के दलाली घेतली जात आहे. रोखीच्या व्यवहारात तर दोन टक्के दलाली शेतकऱ्यांवर लादली जात आहे. केवळ गरजेपोटी शेतकरी हा फटका सहन करीत आहेत. गंभीर बाब ही की, या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दलालांचा कारभार ‘सैैराट’ झाला आहे. नियमानुसार दलालांनी त्यांची दलाली कापूस खरेदीदार व्यापाºयाकडून घेणे अपेक्षित आहे. मात्र काही दलाल व्यापाऱ्यांकडूनही दलाली घेत आहेत, आणि शेतकºयांनाही दलालीच्या नावाखाली लुटत आहेत.यंदा कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कपाशीचे ६० टक्के नुकसान झाले. जेथे एका हंगामात १० ते ११ वेळा कापूस वेचणी व्हायची, तेथे केवळ एका वेचणीने शेत रिकामे झाले. त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कर्ज काढून कापसाचे उत्पादन घेणारे शेतकरी या संकटाने पार कोलमडून गेलेत. हाती आलेला कापूस विकून येईल त्या रकमेत पुढील गरजा भागविण्याच्या मानसिकतेत शेतकरी असताना व्यवस्थेकडून त्यांना नागवले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असताना, शेतकरी नेते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सीसीआयच्या पारड्यात १०० क्विंटलयंदा शासनाची अधिकृत कापूस खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला नाही. परिणामी या हंगामात ९ डिसेंबरपर्यंत सीसीआयला केवळ १०० क्विंटल कापूस खरेदी करता आला. खासगीत शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे.