शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार....

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : वणी उपविभागात कापूस उत्पादकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार संस्थांमधील दलाल शेतकऱ्यांकडून एक ते दीड टक्के दलाली वसूल करीत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.अगोदरच कपाशीचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात आता दलालीचा बोझा सहन करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. १०० रुपयांमागे एक ते दीड टक्के दलाली घेतली जात आहे. रोखीच्या व्यवहारात तर दोन टक्के दलाली शेतकऱ्यांवर लादली जात आहे. केवळ गरजेपोटी शेतकरी हा फटका सहन करीत आहेत. गंभीर बाब ही की, या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दलालांचा कारभार ‘सैैराट’ झाला आहे. नियमानुसार दलालांनी त्यांची दलाली कापूस खरेदीदार व्यापाºयाकडून घेणे अपेक्षित आहे. मात्र काही दलाल व्यापाऱ्यांकडूनही दलाली घेत आहेत, आणि शेतकºयांनाही दलालीच्या नावाखाली लुटत आहेत.यंदा कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कपाशीचे ६० टक्के नुकसान झाले. जेथे एका हंगामात १० ते ११ वेळा कापूस वेचणी व्हायची, तेथे केवळ एका वेचणीने शेत रिकामे झाले. त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कर्ज काढून कापसाचे उत्पादन घेणारे शेतकरी या संकटाने पार कोलमडून गेलेत. हाती आलेला कापूस विकून येईल त्या रकमेत पुढील गरजा भागविण्याच्या मानसिकतेत शेतकरी असताना व्यवस्थेकडून त्यांना नागवले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असताना, शेतकरी नेते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सीसीआयच्या पारड्यात १०० क्विंटलयंदा शासनाची अधिकृत कापूस खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला नाही. परिणामी या हंगामात ९ डिसेंबरपर्यंत सीसीआयला केवळ १०० क्विंटल कापूस खरेदी करता आला. खासगीत शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे.