शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांवर दलालीचा बोझा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार....

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : वणी उपविभागात कापूस उत्पादकांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : निसर्गाच्या फटक्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता दलालांच्या लुटीचा सामना करावा लागत आहे. नियमानुसार कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारात दलाली घेता येत नसताना वणी शहरासह उपविभागातील कापूस खरेदीदार संस्थांमधील दलाल शेतकऱ्यांकडून एक ते दीड टक्के दलाली वसूल करीत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.अगोदरच कपाशीचे उत्पन्न निम्म्यापेक्षा कमी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला. त्यात आता दलालीचा बोझा सहन करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. १०० रुपयांमागे एक ते दीड टक्के दलाली घेतली जात आहे. रोखीच्या व्यवहारात तर दोन टक्के दलाली शेतकऱ्यांवर लादली जात आहे. केवळ गरजेपोटी शेतकरी हा फटका सहन करीत आहेत. गंभीर बाब ही की, या दलालांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने दलालांचा कारभार ‘सैैराट’ झाला आहे. नियमानुसार दलालांनी त्यांची दलाली कापूस खरेदीदार व्यापाºयाकडून घेणे अपेक्षित आहे. मात्र काही दलाल व्यापाऱ्यांकडूनही दलाली घेत आहेत, आणि शेतकºयांनाही दलालीच्या नावाखाली लुटत आहेत.यंदा कापसावर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कपाशीचे ६० टक्के नुकसान झाले. जेथे एका हंगामात १० ते ११ वेळा कापूस वेचणी व्हायची, तेथे केवळ एका वेचणीने शेत रिकामे झाले. त्यामुळे शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कर्ज काढून कापसाचे उत्पादन घेणारे शेतकरी या संकटाने पार कोलमडून गेलेत. हाती आलेला कापूस विकून येईल त्या रकमेत पुढील गरजा भागविण्याच्या मानसिकतेत शेतकरी असताना व्यवस्थेकडून त्यांना नागवले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली असताना, शेतकरी नेते गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सीसीआयच्या पारड्यात १०० क्विंटलयंदा शासनाची अधिकृत कापूस खरेदीदार एजन्सी असलेल्या सीसीआयला कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला नाही. परिणामी या हंगामात ९ डिसेंबरपर्यंत सीसीआयला केवळ १०० क्विंटल कापूस खरेदी करता आला. खासगीत शेतकºयांना चांगला भाव मिळत आहे.