शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

जिल्ह्यातील क्रियाशील गुंडांना तडीपार करा

By admin | Updated: August 9, 2015 00:02 IST

आगामी पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांनी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे.

अखिलेशकुमार सिंह : सण-उत्सवातील शांततेसाठी उपाययोजना सुरू यवतमाळ : आगामी पोळा, गणेशोत्सव, दुर्गोत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिसांनी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. त्याअंतर्गत समाजात धोकादायक वाटणाऱ्या, क्रियाशील गुंडांना तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिले आहेत. शनिवारी जिल्हाभरातील उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदारांची महत्वपूर्ण क्राईम मिटींग मुख्यालयात पार पडली. यावेळी अखिलेशकुमार सिंह यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. आगामी सण-उत्सव या विषयावर सखोल चर्चा झाली. संवेदनशील ठिकाणे, तेथील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटनांचा इतिहास यावर चर्चा केली गेली. गणेशोत्सव, दुर्गोत्सव शांततेत पार पडावे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. जातीय दंगली, दोन समाजातील हाणामारी, विटंबना या सारख्या प्रकरणात रेकॉर्डवर असलेल्या तसेच समाजासाठी त्रासदायक ठरणाऱ्या गुंडांची हिस्ट्रीशिट तपासून त्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. पोळा कुठे-कुठे भरतो, तेथील घटनांचे इतिहास यावरही नजर टाकण्यात आली. क्रियाशील गुन्हेगारांना रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांद्वारे प्रतिबंधात्मक कारवाईचे हत्यार वापरण्याच्या सूचना करण्यात आल्या. बैठकीच्या दुसऱ्या सत्रात पाहिजे-फरारी आरोपींची वाढती संख्या, समन्स-वॉरंट, न्यायालयात दाखल खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविणे या विषयांवर एसपींनी आढावा घेतला. शिक्षेचा दर वाढावा यासाठी दोषारोपपत्रात कोणत्याही त्रुट्या राहणार नाही याची खबरदारी घेतानाच पैरवी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, असे निर्देश अखिलेशकुमार सिंह यांनी दिले. या बैठकीत वाढत्या चोऱ्या-घरफोड्या, डिटेक्शनचे न वाढणारे प्रमाण याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. दारू-जुगार, अवैध प्रवासी वाहतूक बंद करा असे सूतोवाच एसपींनी पुन्हा एकदा या बैठकीत केले. (कार्यालय प्रतिनिधी)