शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सीबीएसईत चमकदार कामगिरी

By admin | Updated: May 29, 2016 02:30 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

जान्हवी विदर्भात अव्वल : यवतमाळ पब्लिक स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा कायम यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यवतमाळातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी यात चमकदार कामगिरी केली. यवतमाळ पब्लिक स्कूलने १०० टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली तर स्कूल आॅफ स्कॉलर्स आणि केंद्रीय विद्यालयाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या जान्हवी जयप्रकाश राठी हिने विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जान्हवी जयप्रकाश राठी हिने ९९.०६ टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. तर याच स्कूलचा विद्यार्थी सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के गुण मिळाले आहे. तर आदित्य अंबाडकर आणि चैतन्य चावक या दोघांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहे. वायपीएसचे दहावीच्या परीक्षेला १२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले आहे. वायपीएसच्या १५ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. स्कूल आॅफ स्कॉलर्स यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या १६४ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले. लुम्बिनी फुलझेले ही ९७.२ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली. वेदांत राठोड याने ९७ टक्के गुण घेत द्वितीय स्थान मिळविले. अमन झांबड व खुशी भारती यांनी प्रत्येकी ९५.८ टक्के गुण घेत तृतीय स्थानी राहिले. पारूल डंभारे व ऋतुजा सातपुते यांनी प्रत्येकी ९५.२ टक्के गुण प्राप्त करत चौथे स्थान मिळविले. अथर्व कोकाटे हा ९४.८ टक्के गुण घेत पाचव्या स्थानी राहिला.यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले आहे. श्रृती शरद घारोड, गायत्री कैलास उईके, अनुराग प्रधान, नचिकेत राठोड, सर्वेश पवार हे विद्यार्थी ९५ टक्केच्यावर गुण घेत यशस्वी झाले आहेत. यवतमाळ येथील सेंट अलॉयसिअसची विद्यार्थिनी साक्षी सुधीर वानखडे ही ९८ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. सीबीएसई बोर्डात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून गुणवंत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर वार्ताहर)