शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सीबीएसईत चमकदार कामगिरी

By admin | Updated: May 29, 2016 02:30 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

जान्हवी विदर्भात अव्वल : यवतमाळ पब्लिक स्कूलची १०० टक्के यशाची परंपरा कायम यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यवतमाळातील सीबीएसई बोर्डाच्या शाळांनी यात चमकदार कामगिरी केली. यवतमाळ पब्लिक स्कूलने १०० टक्के निकाल देत यशाची परंपरा कायम ठेवली तर स्कूल आॅफ स्कॉलर्स आणि केंद्रीय विद्यालयाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलच्या जान्हवी जयप्रकाश राठी हिने विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने यवतमाळ जिल्ह्याची मान उंचावली आहे. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलने गत सात वर्षांपासून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जान्हवी जयप्रकाश राठी हिने ९९.०६ टक्के गुण मिळवून विदर्भात अव्वल स्थान पटकाविले. तर याच स्कूलचा विद्यार्थी सौरभ प्रदीप ठोकाडे आणि वेदांत लक्ष्मीकांत देशपांडे यांना ९९ टक्के गुण मिळाले आहे. तर आदित्य अंबाडकर आणि चैतन्य चावक या दोघांना ९८.०८ टक्के गुण मिळाले आहे. वायपीएसचे दहावीच्या परीक्षेला १२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ३५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षाही अधिक गुण मिळाले आहे. वायपीएसच्या १५ विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. स्कूल आॅफ स्कॉलर्स यवतमाळ येथील स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या १६४ विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३७ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले. लुम्बिनी फुलझेले ही ९७.२ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली. वेदांत राठोड याने ९७ टक्के गुण घेत द्वितीय स्थान मिळविले. अमन झांबड व खुशी भारती यांनी प्रत्येकी ९५.८ टक्के गुण घेत तृतीय स्थानी राहिले. पारूल डंभारे व ऋतुजा सातपुते यांनी प्रत्येकी ९५.२ टक्के गुण प्राप्त करत चौथे स्थान मिळविले. अथर्व कोकाटे हा ९४.८ टक्के गुण घेत पाचव्या स्थानी राहिला.यवतमाळ येथील केंद्रीय विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी ९५ टक्केच्यावर गुण घेतले आहे. श्रृती शरद घारोड, गायत्री कैलास उईके, अनुराग प्रधान, नचिकेत राठोड, सर्वेश पवार हे विद्यार्थी ९५ टक्केच्यावर गुण घेत यशस्वी झाले आहेत. यवतमाळ येथील सेंट अलॉयसिअसची विद्यार्थिनी साक्षी सुधीर वानखडे ही ९८ टक्के गुण घेत शाळेतून पहिली आली आहे. सीबीएसई बोर्डात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून गुणवंत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. (शहर वार्ताहर)