शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:19 IST

दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.

ठळक मुद्देदारव्हा उपविभाग : पूल, डांबरीकरणाचा दर्जा निकृष्ट, पोटकंत्राटदाराची झाली पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वार्षिक निधीतून दारव्हा तालुक्यात कामठवाडा ते वडगाव गाढवे या रस्त्यावरील रपट्यांवर पुलांचे बांधकाम करण्यात आले. निविदा प्रक्रियेनंतर यवतमाळच्या गुघाणे कंस्ट्रक्शन कंपनीला कंत्राट मिळाले. त्यांनी हे काम दारव्हा तालुक्यातील एका खासगी पोटकंत्राटदाराला दिले. त्याने या तांत्रिक कामाचे तुकडे पाडून लेबर काँट्रॅक्टरला दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणारी एजंसी सतत बदलत गेली, तसतसा कामाचा दर्जाही खालावला. बांधकाम विभागाची स्थानिक यंत्रणा केवळ देखरेखीपुरती मर्यादित झाली.निकृष्ट कामामुळे चिकणी येथील पाझर तलावासमोरील पुलाचे काम पहिल्या पावसातच उघडे पडले. बुधवारी रात्री या परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसात पुलावर मोठा खड्डा पडला. पिचिंग व मुरुम न वापरल्याने आता येथे चक्क वाहन फसू शकेल, अशी स्थिती आहे. चार चाकी वाहन या पुलावरून जाऊ शकत नाही. यावरून पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार झाल्याची ओरड सुरू आहे.सरपंच तक्रार करण्याच्या तयारीतया कामासोबत १२०० मीटर डांबरीकरणही केले गेले. त्याचाही दर्जा सुमार असून गुणवत्ता नियंत्रण व दक्षता विभागाकडून या कामाचे नव्याने मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. दारव्हा उपविभागातील इतरही अनेक कामे याच पद्धतीने केली जातात, अशी ओरड आहे. सखोल तपास झाल्यास गंभीर प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निकृष्ट कामाबाबत परिसरातील काही सरपंचांनी कार्यकारी अभियंता व आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे.