शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वटफळीतील बीपीएल कुटुंब घरकूल लाभापासून वंचित

By admin | Updated: June 27, 2017 01:28 IST

स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.

ग्रामपंचायतीची आडकाठी : जागेविषयी अनेक प्रश्न लोकमत न्यूज नेटवर्कनेर : स्वमालकीची जागा असूनही केवळ ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे वटफळी येथील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात लोकशाही दिनात दाखल झालेल्या तक्रारीवरही कारवाई झाली नाही. त्यामुळे या वंचित नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. वटफळी येथे गट क्र.१४२ मध्ये मागील ४० वर्षांपासून अनेक कुटुंब वास्तव्याला आहे. ग्रामपंचायतीच्या दप्तरी रहिवाशांची स्वत:च्या नावे जागा असल्याची नोंदही आहे. परंतु ग्रामपंचायतीने काही वर्षांपासून गट क्र.१४२ ही अतिक्रमणात असून तेथे घरकूल देता येत नाही, असा आदेश काढला. वास्तविक या भागामध्ये यापूर्वी चार टप्प्यात घरकूल झाले आहे. आता मात्र सरपंच, सचिव आणि काही सदस्यांकडून ही जागा महसूल विभागाच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असल्याचेही कधीकधी सांगितले जाते. नेमकी ही जागा कुणाची असा प्रश्न उपस्थित होत असतानाच गरजू मात्र घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे. यासंदर्भात नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. परंतु कुणीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायतीला त्यांच्याकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आता ५० नागरिकांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे.