शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सावकारी कर्जमाफीचा शेतकऱ्यांना भोपळा

By admin | Updated: July 22, 2015 00:26 IST

शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली.

लोकमत विशेषरूपेश उत्तरवार यवतमाळ शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सावकारी कर्जमाफीची घोषणा केली. ३० जूनपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील ५२ सावकारांनी ७९४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर केले. यानंतर २० दिवसांचा कालावधी लोटला तरी कर्जमाफीची रक्कम सावकारांच्या खात्यात जमा झाली नाही. परिणामी सावकाराकडे गहाण असलेली शेती आणि सोन अद्यापही शेतकऱ्यांना परत मिळाले नाही. यामुळे सावकारग्रस्त शेतकरी अडचणीत सापडले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात १०१ सावकार आहेत. या सावकारांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सावकारी कर्ज घेणारे शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरणार आहेत. अशा शेतकऱ्यांचा अहवाल तालुका उपनिबंधकाकडे सादर करायचा होता. जिल्ह्यातील ५२ सावकारांनीच अहवाल सहकार विभागाकडे सादर केले आहे.अधिकृत सावकारांच्या अहवालानुसार त्यांनी ७९४ शेतकऱ्यांना दोन कोटी ४२ लाख ६६ हजार रूपयांचे कर्ज वितरीत केले. हे शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरणार आहे. शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्यापूर्वी त्याचे अंकेक्षण केले जाते. ७९४ प्रकरणांपैकी २७१ प्रस्तावाची तपासणी करण्यात आली. इतर प्रस्ताव तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.विशेष म्हणजे, हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्याचा अद्यादेश राज्य शासनाने काढला. ३० जूनपुर्वीच कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशा सूचना होत्या. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावनीच झाली नाही. यामुळे पेरणी तोंडावर असलीतरी शेतकऱ्यांनी सावकारांकडे गहाण ठेवलेल्या वस्तू परत मिळाल्याच नाही. यातून शेतकरी अडचणीत सापडले आहे.