शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बोंडअळी मदतीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 21:58 IST

संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

ठळक मुद्देशासनाचा वाटा हेक्टरी ६८०० : बियाणे कंपन्या न्यायालयाच्या वाटेवर

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. निकषानुसार शासनाचा वाटा हेक्टरी ६८०० रुपये आहे. तर दुसरीकडे बियाणे कंपन्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. परिणामी कर्जमाफी प्रमाणेच बोंडअळीग्रस्तांच्या मदतीचे होणार आहे.यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले. विदर्भात सुमारे ४० लाख हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. मदतीसाठी शेतकऱ्यांनी आवाज उठविला. विरोधकांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकारला मदत देण्यास भाग पाडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोंडअळी नुकसानीसाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपये मदतीची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत येईल तेव्हा नुकसानग्रस्त शेतकºयांचा भ्रमनिरास होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार शासनाचा वाटा ६८०० रुपये एवढा आहे. इतर वाटा हा बियाणे कंपन्या आणि विमा कंपन्यावर सोपविण्यात आला आहे. त्यातही दोन हेक्टरपर्यंतच मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाते. ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले तरच शेतकरी मदतीस पात्र ठरतो. परिणामी अनेक शेतकरी या निकषामुळे मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.बोंडअळी नुकसानीसाठी पीक विम्यातून आठ हजार रुपये कापूस उत्पादकांना दिले जाणार आहे. त्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला त्यांनाच गुलाबी बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे. ज्यांनी विमाच उतरविला नाही, असे अनेक शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही हाही संभ्रम निर्माण झाला आहे. कापूस नियंत्रण कायद्यानुसार बियाणे कंपन्यांकडून १६ हजार रुपये मदत दिली जाते. राज्य शासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य शासन, बियाणे कंपन्या आणि विमा कंपनी अशा तिघांकडून एकत्रित मदत ३० ते ३७ हजार रुपये मिळणार आहे. परंतु अनेक बियाणे कंपन्या शासन निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. परिणामी १६ हजार रुपये मदतीवरही प्रश्नचिन्ह लागले आहे.एकंदरित शासनाने मदतीची घोषणा केली. परंतु विविध निकष आणि कंपन्यांमुळे ही मदत शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागणार आहे. कर्जमाफीचे पैसे खात्यात येण्यासाठी सहा महिने लागले, तेही संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. आता बोंडअळीग्रस्तांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार हेही महत्वाचे आहे.बियाणे कंपन्यांनी केले हात वरबियाणे कंपन्यांची जबाबदारी उगवणशक्ती आणि बियाण्यांची शुद्धता येथपर्यंतच मर्यादित आहे. यासोबत तंत्रज्ञानाची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. प्रत्येक बियाण्यांच्या पॉकीटवर बीटी तंत्रज्ञानाची रॉयल्टी घेतली आहे. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी आम्ही जबाबदार कसे असे म्हणत कंपन्यांनी सुरुवातीलाच हातवर केले आहे.

टॅग्स :cottonकापूस