शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रवेशातही बोगस आदिवासींची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 10:55 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये हजारो बोगस आदिवासींनी राखीवर जागा बळकावल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यातच आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देमाहिती अधिकारात उघड९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत, संख्या वाढण्याची शक्यता

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये हजारो बोगस आदिवासींनी राखीवर जागा बळकावल्याचे प्रकार पुढे येत आहेत. त्यातच आता वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही राखीव जागांचा लाभ घेण्यासाठी गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. आदिवासी संघटनांनी माहिती अधिकारातून असे ९७ विद्यार्थी शोधले असून त्यांचे प्रवेशही अडचणीत आले आहेत.एमबीबीएस प्रवेशासाठी देशपातळीवरील ‘नीट’ परीक्षेतून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात अनेक गैरआदिवासी विद्यार्थी आदिवासी असल्याचा दावा करून राखीव जागांवर प्रवेश घेत असल्याचा दावा बिरसा क्रांतिदलाने केला आहे. आदिवासींच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या या संघटनेने राज्यातील विविध ठिकाणच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे माहिती अधिकारात माहिती मागितली. औरंगाबाद विभागीय समितीने नुकतीच ही माहिती दिली असून ९७ गैरआदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासींच्या जागांवर प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यातून उघड झाले. तर नागपूर आणि अमरावती विभागीय समितीकडून अद्याप माहिती मिळणे बाकी आहे.‘नीट’ उत्तीर्ण झाल्यावर मिळालेल्या महाविद्यालयात अनेक विद्यार्थी बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे राखीव जागांवर प्रवेश घेतात. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्रही देतात. परंतु, प्रवेश घेतल्यावर वैधता प्रमाणपत्र सादर करणे टाळतात. राज्यात अशी हजारो प्रकरणे असल्याचा आरोप बिरसा क्रांतिदलाने केला आहे.यंदा वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. मात्र औरंगाबाद विभागातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने त्यातील ९७ विद्यार्थ्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. यात नांदेड, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, बिड, परभणी, औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर नागपूर आणि अमरावती विभागीय समितीकडून माहिती मिळताच विदर्भातील प्रकरणेही पुढे येण्याची शक्यता आहे.

‘वैधता’ असेल, तरच प्रवेशदरम्यान, यंदा बोगस जातप्रमाणपत्रांवर उच्च शिक्षणात होणारी घुसखोरी टाळणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ९ जुलै रोजीच दिला आहे. ज्या उमेदवारांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जातवैधता प्रमाणपत्र मिळाले त्यांना प्रवेश द्यावा आणि रिक्त राहिलेल्या जागांवर ज्यांच्याकडे आधीच जातवैधता प्रमाणपत्र आहे, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे या आदेशात म्हटले आहे. या विषयाकरिता उच्च न्यायालयात विशेष खंडपीठ गठीत करावे, असे निर्देशही त्यात आहेत. त्यामुळे जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांना न्यायालयात गेल्याविना प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.

शिक्षण व सेवा क्षेत्रात घटनात्मक तरतुदींमुळे आदिवासींना राखीव जागा प्राप्त झाल्या आहेत. पण त्याचा फायदा गैरआदिवासींनी घेतला. त्यांनी बनावट जातप्रमाणपत्र मिळवून आदिवासींच्या राखीव जागा हडप केल्या. त्यामुळे सरकारने आदिवासींच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण करून खऱ्या आदिवासींना प्रवेश द्यावा, अशी आमची मागणी आहे.- प्रमोद घोडाम, बिरसा क्रांतिदलाचे राज्य महासचिव

टॅग्स :Medicalवैद्यकीय