शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांनी थाटले दवाखाने

By admin | Updated: June 24, 2015 00:10 IST

तालुका आरोग्य विभागाच्या कामचुकारपणाचा लाभ घेत तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे.

आरोग्य विभाग मेहेरबान : कुणाचीच भीती नाही, ग्रामीण जनतेच्या जिवाशी खेळमारेगाव : तालुका आरोग्य विभागाच्या कामचुकारपणाचा लाभ घेत तालुक्यातील अनेक गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. गरीब जनतेच्या जिवाशी हे डॉक्टर खेळत असून तालुका आरोग्य विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.आरोग्य सेवेच्या बाबतीत तालुका नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, यामुळे अनेकदा ग्रामीण जनतेला उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहे. तथापि, त्यांच्या मृत्यूची कोणीही दखल घेत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र ‘चांगभलं’ सुरू आहे. तालुक्यात आरोग्य विभागाची सेवा मिळत नसल्याने बोगस डॉक्टरांनी नेहमीच तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र यापूर्वी तालुका आरोग्य विभागाच्या दक्ष भूमिकेमुळे त्यांना बिनबोभाट व्यवसाय करता येत नव्हता. तथापि, विद्यमान तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरांना अभय दिल्याची चर्चा असून तालुक्यातील आठ मोठ्या गावात या बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने बिनबोभाट थाटली आहे.या बोगस डॉक्टरांकडे व्यवसाय करण्याचे कसलेही परवाने नसतात. त्यांनी कसल्याही प्रकारचा वैद्यकीय अभ्यासक्रम केलेला नसतो. हे डॉक्टर सुरूवातीला काही दिवस मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली परिचर म्हणून काम करतात. तेथे मिळालेल्या जुजबी ज्ञानाच्या भरवशावर ते आदिवासी भागात जाऊन नागरिकांच्या अज्ञानाचा लाभ घेत त्यांच्या आरोग्याशी खेळतात. त्यांच्याकडे उपचाराचे केवळ जुजबी ज्ञान असताना मोठमोठ्या आजारांवर ते औषधोपचार करतात.या डॉक्टरांकडे उपचाराची कोणतेही साधने नसतात. गर्भपात करणे, एखाद्यावर जटील आजाराची शस्त्रक्रिया करणे, आजाराच्या ठिकाणी थेट इंजेक्शन टोचून आजार बधीर करणे, असे अघोरी उपचार ते करीत असतात. या अघोरी उपचारातून बरेचदा नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले. नुकतेच एका बोगस डॉक्टरचे अनधिकृत गर्भपाताचे प्रकरण पोलिसात पोहोचले. अनेकांना या डॉक्टरांकडे उपचार केल्याने अपंगत्व स्विकारावे लागले, तर काहींना आपले प्राणही गमवावे लागले. तथापि ग्रामस्थांमध्ये अज्ञान असल्याने आणि भितीपोटी ते तक्रार करीत नसल्याने या बोगस डॉक्टरांचे चांगलेच फावत आहे. सध्या तालुक्यात नवरगाव, म्हैसदोडका, रोहपट, बोटोणी, करणवाडी, खडकी, बुरांडा, कुंभा, नरसाळा, मार्डी, चोपण, चनोडा, कानोडा आदी गावांत बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. या बोगस डॉक्टरांमध्ये बहुतांश बंगालमधील डॉक्टरांचा समावेश आहे. दोन मराठी तरूणांचाही त्यात समावेश असल्याची कुजबूज सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)पदवीही नाही आणि परवानाही नाहीसाथरोग उद्भवल्यानंतर घेतले जाते आरोग्य शिबिर तालुक्यात बोगस डॉक्टरांनी दुकानदारी थाटल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गावंडे यांनी दिली. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच या बोगस डॉक्टरांना प्रॅक्टीस न करण्याच्या लेखी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूचना देऊनही बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करताना आढळल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डॉ.गावंडे यांनी दिली.नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात तालुक्यात साथीच्या आजारांची लागण होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले. साथीची लागण होऊन नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर त्या गावात आरोग्य शिबिर घेतले जाते. तालुक्यात साथीच्या आजारांबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.आरोग्य सेवेचा उडाला बोजवाराग्रमाीण भागातील रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामचलाऊ धोरणामुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा, औषधांच्या तुटवड्यामुळे गर्भवती महिलांची प्रसूती घरी किंवा या बोगस डॉक्टरांच्या निगराणीखाली होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आलेल्या रूग्णांना उपचाराअभावी आल्यापावली परत जावे लागत आहे.