शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:43 IST

तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देटरबूज बियाण्यांचा दगा : चार गावातील शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.टरबूज पिकाला अल्प फुल व जी फळे आलीत ती वाकडीतिकडी आढळून आली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करुनही या दोषाचे प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निर्देशनास आले.निंबी पारडी, भोजला ही तीन गावे टरबुजच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्ता पूर्ण टरबुजाचे पीक गावातील शेतकरी घेतात. परंतु यावर्षीच्या संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. या बोगस बियाण्याला एकूण २२ शेतकरी बळी पडलेले आहे. या बोगस बियाण्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याने शेतकरी चिंतातुर व अस्वस्थ झालेला आहे.शेतकºयांच्या नुकसानीची कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर बियाणे कंपनीकडून लागवड खर्च व येणारे उत्पन्न वसूल केले जाईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी शेतकºयांना दिले. यावेळी तिवारी यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या सोबत चर्चा केली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून तातडीने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, विलंब झाल्यास हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हे बोगस बियाणे, किटकनाशकची मालिका थांबायचे नाव घेत नाही. संबंधित यंत्रणाच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनीष जाधव यांनी केले आहे .यावेळी एसडीओ नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, गटविकास अधिकारी गवई, तालुका कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, प्रा.महादेव गावंडे, संजय कुंभारे, हेमंत ठाकरे, निखिल ठाकरे, विजय राऊत, भालचंद्र पेन्शनवार, जिजाबाई गावंडे , विशाल ठाकरे, गजानन ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.