शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:43 IST

तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देटरबूज बियाण्यांचा दगा : चार गावातील शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.टरबूज पिकाला अल्प फुल व जी फळे आलीत ती वाकडीतिकडी आढळून आली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करुनही या दोषाचे प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निर्देशनास आले.निंबी पारडी, भोजला ही तीन गावे टरबुजच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्ता पूर्ण टरबुजाचे पीक गावातील शेतकरी घेतात. परंतु यावर्षीच्या संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. या बोगस बियाण्याला एकूण २२ शेतकरी बळी पडलेले आहे. या बोगस बियाण्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याने शेतकरी चिंतातुर व अस्वस्थ झालेला आहे.शेतकºयांच्या नुकसानीची कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर बियाणे कंपनीकडून लागवड खर्च व येणारे उत्पन्न वसूल केले जाईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी शेतकºयांना दिले. यावेळी तिवारी यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या सोबत चर्चा केली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून तातडीने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, विलंब झाल्यास हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हे बोगस बियाणे, किटकनाशकची मालिका थांबायचे नाव घेत नाही. संबंधित यंत्रणाच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनीष जाधव यांनी केले आहे .यावेळी एसडीओ नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, गटविकास अधिकारी गवई, तालुका कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, प्रा.महादेव गावंडे, संजय कुंभारे, हेमंत ठाकरे, निखिल ठाकरे, विजय राऊत, भालचंद्र पेन्शनवार, जिजाबाई गावंडे , विशाल ठाकरे, गजानन ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.