शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

वरोडीत धुऱ्याच्या वादात खून

By admin | Updated: October 22, 2014 23:24 IST

शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव : पाच आरोपींचे पोलिसांपुढे आत्मसमर्पणमहागाव : शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यातील पाच आरोपींनी महागाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून आरोपीत दोन भाऊ आणि चार मुलांचा समावेश आहे. आत्माराम हिरा अडकिने (४५) रा. वरोडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अडकिने नेहमीप्रमाणे शेतात ओलितासाठी बुधवारी सकाळी गेले. यावेळी शेजारील शेतकरी मस्के याच्यासोबत धुऱ्याचा वाद उफाळून आला. या वादात संभाराव आनंदराव मस्के, आनंदराव संभा मस्के, विलास संभाराव मस्के, हसन संभाराव मस्के, कुबेर संभाराव मस्के आणि सतीश आनंदराव मस्के यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने आत्मारामचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विन पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान यातील संभाराव मस्के आणि त्यांच्या चार मुलांनी महागाव पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. अडकिने आणि मस्के यांच्यात २००८ पासून धुऱ्याचा वाद होता. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. तसेच आत्माराम अडकिने यांनी प्रशासनाच्या कानीही वाद घातला होत. तसेच न्याय मिळावे म्हणून महागाव तहसीलसमोर उपोषणही केले होते. मात्र या प्रकरणी कुणीच योग्य दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी याचे पर्यावसान आत्मारामच्या खुनात झाले. (शहर प्रतिनिधी)