शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:14 IST

शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दिले रक्त : तरूणाने व्यक्त केला संताप, तिरंगा चौकात चक्री धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.येथील तिरंगा चौकात शेतकरी संघर्ष समितीने अभिनव चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी दुसऱ्या दिवशी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी म्हणून रक्तदान केले. यावेळी जवळपास २५ शेतकऱ्यांनी रक्तदान केले. शेतकऱ्यांच्या रक्तात मदतीचा, दातृत्वाचा डीएनए असून सरकारच्या रक्तात मात्र मदतीचा, दातृत्वाचा डीएनएच नाही, असा आरोप शेतकºयांनी केला. सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी, शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून हे रक्तदान असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.शेतकरी देशोधडीला लागत असताना सरकार मूग गिळून आहे. हे सरकार अत्यंत कोडगे झाले. सरकारमध्ये गब्बरसिंग बसले आहेत. यात काही मुंबईत, तर काही दिल्लीत बसले आहे. ते शेतकऱ्यांना लुटायचे काम करीत आहे, असा आरोप शेतकºयांनी केला. यावेळी पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारवर आसूड ओढताना विविध उदाहरणे देत सरकारचा कोडगेपणा दर्शविला. देशभक्ती, भारत माता की जय, गोवंश संरक्षण, आदींच्या नावाखाली सरकार दहशत पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा.घनश्याम दरणे, अशोक बोबडे, स्वाती येंडे, माधुरी अराठे, जितेंद्र मोघे, दिनेश गोगरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.युवकाने रक्त फेकून केला निषेधरक्तदान सुरू असताना बिशन शिंदे नामक शेतकऱ्याने हाताची सुई काढून रक्ताची पिशवी तेथील फलकावर फेकून शासनाचा निषेध केला. या फलकांवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या सरकारने केवळ शेतकऱ्यांचे रक्त शोषणाचेच काम केले असून मदतीचा हात दिला नाही. आता सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. नंतर शिंदे यांना उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आंदोलन मंडपात काही काळ गोंधळ उडाला होता.