शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या रक्तात दातृत्व नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:14 IST

शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी दिले रक्त : तरूणाने व्यक्त केला संताप, तिरंगा चौकात चक्री धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या रक्तात दातृत्वाचा डीएनएच नाही. मात्र शेतकऱ्यांच्या रक्तात ठायीठायी दातृत्व भरले आहे. हेच रक्त शासनाच्या रक्तात मिसळविण्यासाठी शनिवारी चक्रीधरणे आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तिरंगा चौकात रक्तदान करून शासनाचा निषेध केला.येथील तिरंगा चौकात शेतकरी संघर्ष समितीने अभिनव चक्रीधरणे आंदोलन सुरू केले. शनिवारी दुसऱ्या दिवशी समिती सदस्य व शेतकऱ्यांनी सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी म्हणून रक्तदान केले. यावेळी जवळपास २५ शेतकऱ्यांनी रक्तदान केले. शेतकऱ्यांच्या रक्तात मदतीचा, दातृत्वाचा डीएनए असून सरकारच्या रक्तात मात्र मदतीचा, दातृत्वाचा डीएनएच नाही, असा आरोप शेतकºयांनी केला. सरकारला दातृत्वाची जाणीव व्हावी, शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण व्हावी म्हणून हे रक्तदान असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.शेतकरी देशोधडीला लागत असताना सरकार मूग गिळून आहे. हे सरकार अत्यंत कोडगे झाले. सरकारमध्ये गब्बरसिंग बसले आहेत. यात काही मुंबईत, तर काही दिल्लीत बसले आहे. ते शेतकऱ्यांना लुटायचे काम करीत आहे, असा आरोप शेतकºयांनी केला. यावेळी पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सरकारवर आसूड ओढताना विविध उदाहरणे देत सरकारचा कोडगेपणा दर्शविला. देशभक्ती, भारत माता की जय, गोवंश संरक्षण, आदींच्या नावाखाली सरकार दहशत पसरवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा.घनश्याम दरणे, अशोक बोबडे, स्वाती येंडे, माधुरी अराठे, जितेंद्र मोघे, दिनेश गोगरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. नंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.युवकाने रक्त फेकून केला निषेधरक्तदान सुरू असताना बिशन शिंदे नामक शेतकऱ्याने हाताची सुई काढून रक्ताची पिशवी तेथील फलकावर फेकून शासनाचा निषेध केला. या फलकांवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. या सरकारने केवळ शेतकऱ्यांचे रक्त शोषणाचेच काम केले असून मदतीचा हात दिला नाही. आता सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. नंतर शिंदे यांना उपचारार्थ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आंदोलन मंडपात काही काळ गोंधळ उडाला होता.