शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आंधळ्या जीवांची डोळस प्रेमकथा

By admin | Updated: April 30, 2015 00:01 IST

प्रेमात भावना बोलतात. नुसत्या स्पर्शाने माणूस ओळखता येतो अन्् अंगात बळही नसलं तरी प्रेमात बाजी मारता येते.

एकाच विद्यालयाचे विद्यार्थी : नेर येथे सर्वांसमक्ष झाले शुभमंगलकिशोर वंजारी नेर प्रेमात भावना बोलतात. नुसत्या स्पर्शाने माणूस ओळखता येतो अन्् अंगात बळही नसलं तरी प्रेमात बाजी मारता येते. अशाच दोन आंधळ्या जीवांनी आपल्या प्रेमासाठी वाटेल ते केले. शेवटी डोळस प्रेमकथेला आकार मिळाला. दारव्हा तालुक्यातील बागवाडी येथील आंधळा विलास कुंभेकर व नेर येथील वैशाली तातड हे दोन जीव एकत्र आले. आंतरजातीय या विवाहाला अखेर परिवारानेही स्वीकारले.नेर येथील राजेंद्र तातड याची दोन्ही डोळ्यांनी अंध मुलगी व दारव्हा तालुक्यातील बागवाडी येथील पांडुरंग कुंभेकर यांचा मुलगा दोघे अमरावती येथील डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे शिकत होते. गेल्या एक वर्षापूर्वी दोघात प्रेमाचे अंकुर फुलले व दोघांनाही एकमेकांशिवाय करमेनासे झाले. सोबत जगण्यामरणाच्या शपथाही घेतल्या. मात्र या विवाहाला दोन्हीही परिवाराचा विरोध होता. एकतर दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने हा विवाह दोन्ही परिवाराला पसंत नव्हता. अखेर वैशाली आणि विलासला सुट्या लागल्याने दोघेही आपआपल्या घरी गेले. मात्र विलास बागवाडीवरून वैशालीच्या घरी येऊन तिच्या पित्याला लग्नासाठी परवानगी मागत होता. वैशालीचे वडील राजेंद्र तातड यांची या विवाहाला होकार होता. विलासच्या परिवाराला हा विवाह मान्य नव्हता. अखेर या विरोधाला झुगारून विलास आणि वैशाली पळून गेले. या घटनेची फिर्याद वैशालीच्या वडिलाने नेर पोलिसात केली. अखेर पोलिसांनी विलासशी संपर्क करून पोलीस ठाण्याला बोलावले. सर्वासमक्ष दोघांनीही सोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही विवाह योग्य असल्याने पोलिसांनी दोन्ही परिवाराची समजूत घातली. बजरंग दलाचे मधुकर खंडागळे, मोहन पापळकर, शुभम माहूरकर, मुकेश मेश्राम, प्रशांत घरडे, संदीप शेडमाके, शुभम जयसिंगपुरे, बंडू बोरकर, संजय दारव्हटकर, वंदना मिसळे यांनी पुढाकार घेतला.