शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘अच्छे दिन’पासून भाजपाचा यू टर्न

By admin | Updated: August 27, 2015 00:11 IST

केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे.

काँग्रेसचा आरोप : गावागावांत जनजागृती अभियानयवतमाळ : केंद्र व राज्यातील शासन सध्या त्यांनीच दिलेल्या प्रत्येक आश्वासनाच्या बाबतीत ‘यू टर्न’घेत आहे. ‘तो मी नव्हेच’अशी भूमिका शासनाने घेतल्याचे त्यांच्याच बोलण्यातून दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र हाल होत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी बुधवारी येथील आझाद मैदान स्थिती महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित पत्रपरिषदेत केला. ‘केंद्र व राज्याच्या कारभाराचे पर्दाफाश’ जिल्हास्तरीय आंदोलन काँग्रेसकडून काळ्या फिती लावून येथील आझाद मैदानातील गांधीभवनात करण्यात आले. आंदोलनानंतर पत्रपरिषदेत शिवाजीराव मोघे बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध योजना कशा फसव्या आहेत याचीही माहिती दिली. शासनाने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. केवळ भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी काही करण्याची शासनाची इच्छा नाही. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काँग्रेसने त्यांचा हा डाव उधळून लावल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. त्यामुळे कृषीक्रांती ही नावालाच असल्याचे ते म्हणाले. शासन म्हणजे सातबारा कोरा करू पण कर्जमाफी नाही. कर्जमाफी शिवाय सातबारा कोरा कसा होणार, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसने तिजोरी खाली करून ठेवली, असा भाजपाचा आरोप आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, सर्वाधिक कर्ज यापूर्वी भाजपा-सेनेच्या काळातच राज्यावर झाले आहे. त्यामुळे आमच्यावरील हा आरोप निराधार आहे. अशाप्रकारे आंदोलने हे यापुढेही सुरूच राहणार असून गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विजय खडसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजयाताई धोटे, आर्णीचे नगराध्यक्ष आरिज बेग, तातू देशमुख, अरुण राऊत, देवानंद पवार, आनंद गायकवाड आदींचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)कांद्याचे हार अन् हाताला काळया फितीबुधवारी करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग नोंदविला. अनेक कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घुमजाव करणाऱ्या विधानावर यावेळी तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. पंतप्रधानांच्या वक्तव्याची पोलखोल करणारी कॅसेट यावेळी लावण्यात आली होती. त्यांच्या विधानाची वचनपूर्ती होणार कधी, असा प्रश्न यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.