शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

भाजपा राज्य कार्यकारिणीत जिल्ह्याला भोपळा

By admin | Updated: June 12, 2015 02:01 IST

एक-दोन नव्हे तर तब्बल पाच आमदार देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चक्क भोपळा

वचनपूर्तीच्या ‘फ्लॉप-शो’चा परिणाम : पाचही आमदार बेदखल, नेतृत्वाचा अभाव, संघटन मंत्र्यांना मात्र बढतीयवतमाळ : एक-दोन नव्हे तर तब्बल पाच आमदार देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत चक्क भोपळा मिळाला आहे. भाजपा नेत्यांमधील गटबाजी आणि निष्क्रीयतेचा हा फटका मानला जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. मात्र त्यात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही आमदार किंवा पदाधिकाऱ्याला स्थान मिळाले नाही. जिल्ह्यात पूर्वी विधानसभेच्या सात पैकी पाच जागा काँग्रेसकडे होत्या. सन २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत या पाचही जागा भाजपाने खेचून आणल्या. ही मोठी उपलब्धी मानली जाते. एकाच झटक्यात पाच जागांचे मिळालेले हे यश पाहता मंत्रीमंडळात यातील कुणाला तरी स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. आता जुलैमध्ये राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होऊ घातला आहे. त्यात भाजपाच्या सात मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. परंतु त्यासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्येही यवतमाळ जिल्ह्यातील कुणाचाच समावेश नाही. किमान राज्य कार्यकारिणीत तरी आमदार अथवा अन्य स्थानिक नेत्यांना सामावून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीही पूर्णत: फोल ठरली. जिल्ह्यात एक दलित आणि दोन आदिवासी आमदार आहेत. त्यांना आदिवासी आघाडी, दलित आघाडीत अ‍ॅडजेस्ट केले जाईल, असे बोलले जात होते. मात्र तेथेही त्यांच्या नावांचा विचार झाला नाही. पाच आमदार निवडून येऊनही यवतमाळ जिल्ह्याची प्रदेश भाजपाने कोणतीच दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त यवतमाळात वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्हा मुख्यालयाचा हा सोहळा केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्णत: फ्लॉप ठरला. त्यामुळेच येथील आमदार अथवा नेत्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान दिले गेले नसल्याचे भाजपाच्या गोटात बोलले जाते. या ‘फ्लॉप शो’ची दखल घेणारे पश्चिम विदर्भ संघटन मंत्री रामदास अंबटकर यांना मात्र पक्षाने बढती देऊन प्रदेश सरचिटणीस बनविले आहे. मंत्रीमंडळ, राज्य कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने येथील नेत्यांची हुरहुर वाढली आहे. आता मंडळ-महामंडळावरील नियुत्यांच्या वेळीसुध्दा अशीच ‘फ्लॉप ट्रिटमेंट’ तर मिळणार नाही ना, याची भीती व्यक्त होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) विदर्भातील चार जिल्ह्यांना संधी४विशेष असे या कार्यकारिणीत विदर्भातील बुलडाणा, भंडारा, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना स्थान दिले गेले आहे. यवतमाळला भाजपात सक्षम नेतृत्व नसल्यानेच मुंबईत जिल्ह्याची कुणी दखल घेत नसल्याचे सांगितले जाते. भाजपाच्या जिल्ह्यातील आमदार व नेत्यांना (मंत्रीमंडळ असो अथवा प्रदेश कार्यकारिणी) त्यांची जागा वारंवार दाखविली जात आहे. पक्षस्तरावर सातत्याने हा पराभव वाट्याला येत असूनही जिल्हा भाजपातील गटबाजी थांबण्याची चिन्हे नाहीत. नेत्यांच्या या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो आहे. म्हणूनच त्यांच्या नावांचा अद्यापही मंडळ-महामंडळ, जिल्हा, तालुका समित्यांवरील नियुक्त्यांसाठी विचार झालेला नाही.