शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भाजप आमदारावर काँग्रेसचा सुडाच्या राजकारणाचा आरोप

By admin | Updated: March 10, 2016 03:17 IST

काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींवर सूड उगविण्यासाठी यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनी घाईघाईने नगरपरिषद हद्दवाढीचा निर्णय घेतला,

नगरपरिषद हद्दवाढ : शहरालगतच्या आठ गा्रमपंचायतींचे गणित बिघडले यवतमाळ : काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींवर सूड उगविण्यासाठी यवतमाळचे भाजपा आमदार मदन येरावार यांनी घाईघाईने नगरपरिषद हद्दवाढीचा निर्णय घेतला, असा आरोप लगतच्या ग्रामपंचायत सरपंचांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला. शहरालगतच्या आठ ग्रामपंचायतींचा नुकताच यवतमाळ नगरपरिषदेमध्ये समावेश करण्यात आला. नगरपरिषदेच्या या हद्दवाढीमुळे ग्रामपंचायतींचा एकूणच कारभार खोळंबला आहे. या पार्श्वभूमीवर लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, भोसा येथील सरपंच व सदस्यांनी बुधवारी येथे पत्रपरिषद घेवून राजकीय स्वार्थासाठी ही हद्दवाढ झाल्याचा आरोप केला. हे सरपंच म्हणाले, नगरपरिषदेची हद्दवाढ ग्रामपंचायतीच्या विकासासाठी आवश्यक होती. याला आमच्याकडून विरोध झाला नाही. मात्र ज्या पध्दतीने २२ जानेवारीपासून कारभार सुरू आहे, हे पाहता नगरपरिषदेत जाण्याचा निर्णय चुकला याची जाणीव स्थानिक नागरिकांना झाली आहे. यवतमाळ नगरपरिषदेइतकाच भाग नव्याने समाविष्ट होत असताना स्थानिक प्रशासनाकडून कोणतेच पूर्वनियोजन करण्यात आले नाही. उलट ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांना कोंडीत पकडण्यासाठी त्यांच्याकडे असलेला विकास निधी खर्चच होऊ नये या उद्देशाने स्थानिक आमदाराने घाई करून २२ जानेवारीला नगरपरिषद हद्दवाढीची घोषणा करण्यास भाग पाडले. यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, मोहा, भोसा, उमरसरा, वडगाव, डोळंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयातच नगरपरिषदेचे विभागीय कार्यालय असे फलक लावण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कोणाचेही ऐकायचे नाही, असे सांगून कामापासून परावृत्त केले आहेत. आता या कर्मचाऱ्यांवर कोणाचेचे नियंत्रण नाही. भाजपाची सत्ता असलेल्या नगरपरिषदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर करता आला नाही. शिवाय विकास कामांचा मोठा निधी येथे शिल्लक आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठी अनागोंदी निर्माण झाली आहे. कोणत्याच मुलभूत सुविधा ग्रामपंचायत क्षेत्रात मिळत नाही. आता नगरपरिषदेची मुदतपूर्व निवडणूक लावण्याचा अधिकार शासनाला नाही. मात्र हद्दवाढ शांततेने करण्याचा अधिकार नगरविकास विभागाला होता. त्याचा वापर करून पूर्वनियोजन करून हद्दवाढ केली असती तर आजची समस्या निर्माण झाली नसती, असे मत सरपंच व सदस्यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीसाठी आलेला १४ वित्त आयोगाचा निधी, घरकुलाच्या योजना अशी किमान प्रत्येक ठिकाणी होणारी एक कोटींची कामे थांबली आहेत. आज ग्रामपंचायत क्षेत्रासाठी कोणीच वाली नाही. येथे प्रशासकही नेमण्यात आला नाही. नागरिकांना भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले नाही. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ मूलभूत सुविधा द्याव्या, यासाठी १४ मार्चला नगरपरिषदेसमोर धरणे देण्यात येणार आहे. त्यानंतरही समस्या सुटल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला. पत्रपरिषदेला सरपंच अनिल देशमुख (लोहारा), विक्की राऊत (वाघापूर), जयश्री ओम देसाई (पिंपळगाव), किशोर बडे (मोहा), काँग्रेस शहराध्यक्ष चंदू चौधरी, रवींद्र ढोक, फिरोज पठाण, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष नितीन मिर्झापुरे, घनश्याम अत्रे, उमेश इंगळे, सिंकदर शहा, मनवर शहा, अफसर बेग, अतुल रत्नपारखी, मुकेश देशभ्रतार आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)