शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:58 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, ....

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा येथे पार पडला काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’चे खोटे आमिष दाखवून सत्ता काबिज केली. परंतु सत्तेवर येताच या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला, असे प्रतिपादन काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले. सोमवारी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.केळापूर-आर्णी विधानसभा मतदार संघातील महत्त्वाकांक्षी निम्न पैनगंगा प्रकल्प व पांढरकवडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू करण्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर कोणताही प्रयत्न करीत नसल्याचा आरोप मोघे यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष शंकर बडे, विजय पाटील चालबर्डीकर, बाजार समितीचे सभापती प्रकाश मानकर, खविसंचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर, पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, मनोज भोयर, जफर पटेल यांनी विचार व्यक्त केले. यावेळी हज यात्रा करून परत आलेले काँग्रेसचे बाबू बैलीम यांचा शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर शंकरअण्णा नालमवार, जितेंद्र मोघे, भावेश बोरेले, करीम टेलर, अमर पाटील, शिनूअण्णा नालमवार, डच्चू सोखी, हफिज पोसवाल, भाऊ भोयर, प्रेमराव वखरे, सुरेश बेनवार, अशोक काळे उपस्थित होते.