शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बिरसा पर्वात चार ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 21:43 IST

येथील समता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी,.....

ठळक मुद्देसमता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले.

यवतमाळ : येथील समता मैदानात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वात चार ठराव पारित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, आदिवासी महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जावे आदी ठरावांचा यामध्ये समावेश आहे.समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष खासदार अनुसयाताई उईके होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इवनाते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, भारतीय आदिवासी एकता परिषदेचे गुजरातचे अध्यक्ष अशोक चौधरी, प्रा. हमराज उईके, साहित्यिक बाबाराव मडावी, आदिवासी विकास मंडळाच्या संचालिका मिनाक्षी वेट्टी, बिरसा पर्वाचे अध्यक्ष राजू चांदेकर, पुष्पाताई आत्राम, किरण कुमरे उपस्थित होते.खासदार अनुसयाताई उईके म्हणाल्या, आदिवासी समाजाच्या उत्थानाकरिता दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या योजना हाती घेतल्या जातात. मात्र, आदिवासी बांधवांपर्यंत योजना पोहोचतच नाही. अजूनही शुद्ध पाणी गावांपर्यंत पोहोचले नाही. आठ राज्यांच्या दौºयातून हे वास्तव पुढे आले आहे. आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम आयोग करत आहे. आयोगाच्या उपाध्यक्षपदावर निवड झाल्यापासून आठ राज्यांचा दौरा केला. या दौºयादरम्यान आदिवासी समाजातील वस्त्यांचे चित्र भयंकर होते. मध्य प्रदेशमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये शुद्ध पाणी मिळत नाही. यासर्व विषयात आयोगाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारला. तीन दिवसात या ठिकाणचा प्रश्न सुटला. इतरही राज्यांमध्ये आदिवासी बांधवांची स्थिती अशीच चिंताजनक आहे. आदिवासी बांधवांवर अन्याय होतो, त्यांनी खचून न जाता राष्ट्रीय आयोगाचा दरवाजा ठोठावा, असे त्या म्हणाल्या.भारतीय आदिवासी एकता परिषदेचे गुजरातचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक किशोर उईके यांनी केले. संचालन हिरा धुर्वे यांनी केले. प्रफुल्ल आडे, शैलेश गाडेकर, रेखा कन्नाके, बंडू मसराम, राजू केराम, कृष्णा पुसनाके उपस्थित होते.चार ठरावांना मंजुरी६ जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लोकप्रतिनिधींनी पावले उचलावी. सरकारने कारवाई करावी, संविधानात आदिवासी बांधवांना दिलेल्या हक्कांचे पालन व्हावे, आदिवासी महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविण्यात यावे, आदिवासी समाज बांधवांचा जल, जमीन आणि जंगल सुनिश्चित करून सन्मान करण्यात यावा या चार ठरावांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.