शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सात भुसार व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाचाही समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

भुसार व्यापाऱ्यांनी बाजारातील उतार भावात शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन, उधारीत अव्वाच्या सव्वा भावात भुसार माल खरेदी केला होता. बाजारात भाव पडल्यानंतर त्यांना मोठा घाटा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे थकले. आपण आता शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतः दिवाळखोर झाल्याचे घोषित करून तालुक्यातून पळ काढला. यातील ९० टक्के व्यापारी भूमिगत झाले आहे. काहींनी आपले गाव, शहर सोडून पोबारा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातावर तेल चोळत बसावे लागत आहे.

क्षणिक लाभासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. किंबहुना दोन रुपये जास्त नफा मिळेल, या लालसेने संबंधित शेतकऱ्यांनीही आपला माल त्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवाढव्य नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागले आहे. सावकारी व्यवहारात नोंदविल्या गेलेल्या तक्रारीनंतर एखादे वेळेस शेतकऱ्यांना किमान न्याय तरी मिळतो, परंतु या प्रकरणात ती सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.

तालुक्यातील सवना, गुंज, अंबोडा, अनंतवडी, मुडाणा, काळी टेंभी, हिवरा व शहरातील भुसार व्यापाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल दहा ते १५ कोटी रुपयांचा माल खरेदी केला होता. त्याचे सर्व पैसे त्यांनी आपल्याच घशात घातल्याचे फसवणूक झालेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही भुसार व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. परिणामी, आता खासगी भुसार व्यापाऱ्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देउन शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबविण्याची गरज आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांनी घेतली पोलिसांत धाव

दरम्यान, नुकतीच दोन दिवसांपूर्वी एका भुसार व्यापाऱ्यावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी धाव घेतली होती, परंतु सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दुसऱ्या एक व्यापाऱ्याने गुंज परिसरात शेतकऱ्यांना गंडा घातला. तो शेतकऱ्यांना पैसे देण्यास चालढकल करीत आहे.

कोट

कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार माल खरेदी करण्याचा परवाना देताना, किमान २० लाखांची साॅलव्हंसी त्या परवानाधारकांकडून घ्यावी. त्यामुळे तो जबाबदारीने काम करून शेतकऱ्यांना पैसे देऊ शकेल.

शिवाजीराव देशमुख, शेतकरी.

कोट

अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी शेतमाल विकला पाहिजे. त्याची पक्की पावती घेतली पाहिजे. अनेकदा असे होताना दिसत नाही. याबाबतीत अनेकांच्या तोंडी तक्रारी आल्या, परंतु त्यांनी पक्की पावती बाजार समितीकडे सादर केली नाही. त्यामुळे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.

दीपक आडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव.