शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सात भुसार व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाचाही समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

भुसार व्यापाऱ्यांनी बाजारातील उतार भावात शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन, उधारीत अव्वाच्या सव्वा भावात भुसार माल खरेदी केला होता. बाजारात भाव पडल्यानंतर त्यांना मोठा घाटा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे थकले. आपण आता शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतः दिवाळखोर झाल्याचे घोषित करून तालुक्यातून पळ काढला. यातील ९० टक्के व्यापारी भूमिगत झाले आहे. काहींनी आपले गाव, शहर सोडून पोबारा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातावर तेल चोळत बसावे लागत आहे.

क्षणिक लाभासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. किंबहुना दोन रुपये जास्त नफा मिळेल, या लालसेने संबंधित शेतकऱ्यांनीही आपला माल त्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवाढव्य नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागले आहे. सावकारी व्यवहारात नोंदविल्या गेलेल्या तक्रारीनंतर एखादे वेळेस शेतकऱ्यांना किमान न्याय तरी मिळतो, परंतु या प्रकरणात ती सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.

तालुक्यातील सवना, गुंज, अंबोडा, अनंतवडी, मुडाणा, काळी टेंभी, हिवरा व शहरातील भुसार व्यापाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल दहा ते १५ कोटी रुपयांचा माल खरेदी केला होता. त्याचे सर्व पैसे त्यांनी आपल्याच घशात घातल्याचे फसवणूक झालेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही भुसार व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. परिणामी, आता खासगी भुसार व्यापाऱ्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देउन शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबविण्याची गरज आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांनी घेतली पोलिसांत धाव

दरम्यान, नुकतीच दोन दिवसांपूर्वी एका भुसार व्यापाऱ्यावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी धाव घेतली होती, परंतु सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दुसऱ्या एक व्यापाऱ्याने गुंज परिसरात शेतकऱ्यांना गंडा घातला. तो शेतकऱ्यांना पैसे देण्यास चालढकल करीत आहे.

कोट

कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार माल खरेदी करण्याचा परवाना देताना, किमान २० लाखांची साॅलव्हंसी त्या परवानाधारकांकडून घ्यावी. त्यामुळे तो जबाबदारीने काम करून शेतकऱ्यांना पैसे देऊ शकेल.

शिवाजीराव देशमुख, शेतकरी.

कोट

अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी शेतमाल विकला पाहिजे. त्याची पक्की पावती घेतली पाहिजे. अनेकदा असे होताना दिसत नाही. याबाबतीत अनेकांच्या तोंडी तक्रारी आल्या, परंतु त्यांनी पक्की पावती बाजार समितीकडे सादर केली नाही. त्यामुळे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.

दीपक आडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव.