शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

सात भुसार व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ...

महागाव : तालुक्यातील सात भुसार व्यापाऱ्यांनी भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांचे शेतमालाचे कोट्यवधी रुपये थकविले आहे. यात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाचाही समावेश असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

भुसार व्यापाऱ्यांनी बाजारातील उतार भावात शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन, उधारीत अव्वाच्या सव्वा भावात भुसार माल खरेदी केला होता. बाजारात भाव पडल्यानंतर त्यांना मोठा घाटा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे थकले. आपण आता शेतकऱ्यांना पैसे देऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतः दिवाळखोर झाल्याचे घोषित करून तालुक्यातून पळ काढला. यातील ९० टक्के व्यापारी भूमिगत झाले आहे. काहींनी आपले गाव, शहर सोडून पोबारा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हातावर तेल चोळत बसावे लागत आहे.

क्षणिक लाभासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. किंबहुना दोन रुपये जास्त नफा मिळेल, या लालसेने संबंधित शेतकऱ्यांनीही आपला माल त्यांना विकला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवाढव्य नुकसान झाले. शेतकरी देशोधडीला लागले आहे. सावकारी व्यवहारात नोंदविल्या गेलेल्या तक्रारीनंतर एखादे वेळेस शेतकऱ्यांना किमान न्याय तरी मिळतो, परंतु या प्रकरणात ती सोय नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.

तालुक्यातील सवना, गुंज, अंबोडा, अनंतवडी, मुडाणा, काळी टेंभी, हिवरा व शहरातील भुसार व्यापाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांनी तब्बल दहा ते १५ कोटी रुपयांचा माल खरेदी केला होता. त्याचे सर्व पैसे त्यांनी आपल्याच घशात घातल्याचे फसवणूक झालेल्या काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या काही भुसार व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. परिणामी, आता खासगी भुसार व्यापाऱ्यांची विश्वासार्हता कमी होत आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्ष देउन शेतकऱ्याची आर्थिक लूट थांबविण्याची गरज आहे.

बॉक्स

शेतकऱ्यांनी घेतली पोलिसांत धाव

दरम्यान, नुकतीच दोन दिवसांपूर्वी एका भुसार व्यापाऱ्यावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी धाव घेतली होती, परंतु सदर प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दुसऱ्या एक व्यापाऱ्याने गुंज परिसरात शेतकऱ्यांना गंडा घातला. तो शेतकऱ्यांना पैसे देण्यास चालढकल करीत आहे.

कोट

कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार माल खरेदी करण्याचा परवाना देताना, किमान २० लाखांची साॅलव्हंसी त्या परवानाधारकांकडून घ्यावी. त्यामुळे तो जबाबदारीने काम करून शेतकऱ्यांना पैसे देऊ शकेल.

शिवाजीराव देशमुख, शेतकरी.

कोट

अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच शेतकऱ्यांनी शेतमाल विकला पाहिजे. त्याची पक्की पावती घेतली पाहिजे. अनेकदा असे होताना दिसत नाही. याबाबतीत अनेकांच्या तोंडी तक्रारी आल्या, परंतु त्यांनी पक्की पावती बाजार समितीकडे सादर केली नाही. त्यामुळे लुटल्या गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.

दीपक आडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, महागाव.