शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

कोट्यवधींचा खर्च, तरीही रुग्ण खासगीत

By admin | Updated: August 12, 2016 02:16 IST

ग्रामीण जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून पुसद उपविभागात ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली.

आरोग्यसेवा कोलमडली : ‘डॉक्टर आपल्या दारी योजना’ कुचकामी प्रकाश लामणे पुसद ग्रामीण जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा मिळावी म्हणून पुसद उपविभागात ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली. त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र येथे योग्य उपचार होत नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांचाच आधार घ्यावा लागतो. तर गोरगरिबांना गावातील बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची वेळ येते. ‘डॉक्टर आपल्या दारी’ या योजनेचाही पुरता फज्जा उडाला असून पावसाळी वातावरणातही अनेक आरोग्य उपकेंद्रांना चक्क कुलूप लागलेले दिसून येते. सध्या पावसाळी वातावरण असल्याने आजाराचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्र केवळ तापाच्या गोळ्या देण्यापलीकडे कोणतेही काम करताना दिसत नाही. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य सोयीसुविधा मिळत नाही. ग्रामीण भागातील आजारी पडलेला व्यक्ती प्रथम गावातील उपकेंद्रात जातो. तेथे कोणीही भेटत नसल्याने शेवटी आपल्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठतो. परंतु याठिकाणी डॉक्टरच भेटत नाही. कर्मचारी योग्य माहिती देत नाही. अशा स्थितीत आर्थिक भुर्दंड सहन करून रुग्ण पुसदला येतो. परंतु तोपर्यंत उपजिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग बंद झालेला असतो. शेवटी नाईलाजाने रुग्णाला खासगी डॉक्टरांकडे न्यावे लागते. तेथे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयातही सुविधांचा अभाव असून रुग्ण दाखल झाल्यानंतर येथील डॉक्टरांना यवतमाळकडे पाठविण्याची घाई झालेली दिसते. ग्रामीण भागातील गंभीर रुग्णाला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाही. १०८ वाहनाची सुविधाही वेळेवर मिळत नाही. वाहनांचा शोध घेईपर्यंत रुग्णाची प्रकृती गंभीर होवून जाते. सर्व आटापिटा केल्यानंतरही रुग्णावर योग्य उपचार होईलच याची खात्री नसते. ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य उपचार गावातच मिळावे यासाठी १५ आॅगस्ट २००८ पासून ‘डॉक्टर आपल्या दारी’ योजना सुरू केली. मात्र पुसद उपविभागात या योजनेची पुरती वाट लागल्याची स्थिती आहे. डॉक्टर आपल्या दारी तर सोडा डॉक्टरांच्या दारी गेल्यानंतरही उपचार मिळण्याची सुतराम शक्यता नसते. ही योजना म्हणजे केवळ देखावा झाल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत पैसे असलेले रुग्ण खासगी डॉक्टरांकडे धाव घेतात. परंतु अनेक रुग्णांकडे उपचाराचे पैसे नसतात. ती मंडळी गावात येणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. यात रुग्णांचा जीव जाण्याची अधिक शक्यता असते. मुख्यालयाची अ‍ॅलर्जी पुसद तालुक्यात फेट्रा, बेलोरा, शेंबाळपिंपरी, गौळ(बु), चोंढी, जांबबाजार या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने आहे. त्यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र येथे एकही डॉक्टर आणि कर्मचारी राहात नाही. सोयीच्या ठिकाणावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे गावातील या इमारती शोभेच्या झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडूनही दखल घेतली जात नाही.