शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उमरखेडमध्ये विशिष्ट भागातच झाली कोट्यवधींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

अविनाश खंदारे फोटो उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले ...

अविनाश खंदारे

फोटो

उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना विशिष्ट भागातच राबवल्याची ओरडही कायम आहे.

कोट्यवधींच्या याजना राबवूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास झाला नाही. विविध योजनांचे मिळालेले कोट्यवधी रुपये काही विशिष्ट भागातच जास्त प्रमाणात खर्च केल्याचे दिसून येत आहे. येथे २०१६ मध्ये भाजपाची सत्ता आली. योगायोगाने त्यावेळी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार होते. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने भाजपाचे होते. परिणामी राज्यात सत्ता असल्यामुळे अनेक विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी मिळाले. परंतु तो निधी नाथनगर, पाटीलनगर यासह काही विशिष्ट भागातच खर्ची घालण्यात आला.

गोकूळनगर, मोहननगर, महसूल कॉलनी, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, वसनगर, बोरबन, शिक्षक कॉलनी यासह अनेक प्रभागात मूलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना मिळाला नसल्याची ओरड या प्रभागातील नागरिक करीत आहे. नाल्या उपसल्या जात नाही. कचरा गाडी अनेक प्रभागात पोहोचत नाही. साथीचे आजार येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे अपघात होत आहे. पालिकेकडून अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या समस्या निवारण लवकर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु पालिका प्रशासन त्यावर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत नसल्यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत.

कोट

शहरात नाली, रस्ता, तारा मंडळ, बगिचा, अभ्यासिका अशी ३५ कोटींची विकासात्मक कामे केली. बायोगॅस प्रकल्प, स्व. बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि खुल्या जागेच्या सौंदर्यीकरण अशी १५ कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. शहरातील काही प्रभागात कामे राहिली. ती विकासात्मक निधी उपलब्ध होताच पूर्ण केली जातील.

नामदेव ससाने, नगराध्यक्ष, उमरखेड

कोट

शहरातील स्वच्छतेचे काम प्राधान्याने केली जात आहे. अनेक प्रभागात विकासात्मक निधीतून मोठ्या प्रमाणात कामे केली गेली. काही कामे सुरू आहेत. नवीन प्रभागात विकासात्मक निधी उपलब्ध होताच, त्या ठिकाणी कामे केली जातील. शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित सर्वच विभागांशी समन्वय करून वाढलेले अतिक्रमण काढले जाणार आहे.

चारूदत्त इंगुले, मुख्याधिकारी, उमरखेड

या समस्यांकडे द्यावे लागणार लक्ष

१) शहरातील वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देणे अपेक्षित आहे. पालिकेने संबंधितांना नोटिसा देणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

२) पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मोहननगर, आनंदनगर, गोकूळनगर, महसूल कॉलनी, मतेनगर, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर या सह अनेक प्रभागात रस्ता, नाली मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्या त्वरित मिळतील, अशी अपेक्षा आहे.