शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

उमरखेडमध्ये विशिष्ट भागातच झाली कोट्यवधींची विकास कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

अविनाश खंदारे फोटो उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले ...

अविनाश खंदारे

फोटो

उमरखेड : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहे. पालिकेकडून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना विशिष्ट भागातच राबवल्याची ओरडही कायम आहे.

कोट्यवधींच्या याजना राबवूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास झाला नाही. विविध योजनांचे मिळालेले कोट्यवधी रुपये काही विशिष्ट भागातच जास्त प्रमाणात खर्च केल्याचे दिसून येत आहे. येथे २०१६ मध्ये भाजपाची सत्ता आली. योगायोगाने त्यावेळी राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार होते. तत्कालीन आमदार राजेंद्र नजरधने भाजपाचे होते. परिणामी राज्यात सत्ता असल्यामुळे अनेक विकासात्मक कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी मिळाले. परंतु तो निधी नाथनगर, पाटीलनगर यासह काही विशिष्ट भागातच खर्ची घालण्यात आला.

गोकूळनगर, मोहननगर, महसूल कॉलनी, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, वसनगर, बोरबन, शिक्षक कॉलनी यासह अनेक प्रभागात मूलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांना मिळाला नसल्याची ओरड या प्रभागातील नागरिक करीत आहे. नाल्या उपसल्या जात नाही. कचरा गाडी अनेक प्रभागात पोहोचत नाही. साथीचे आजार येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात नाही. शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे अपघात होत आहे. पालिकेकडून अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या समस्या निवारण लवकर होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. परंतु पालिका प्रशासन त्यावर कोणतेही धोरणात्मक निर्णय घेत नसल्यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत.

कोट

शहरात नाली, रस्ता, तारा मंडळ, बगिचा, अभ्यासिका अशी ३५ कोटींची विकासात्मक कामे केली. बायोगॅस प्रकल्प, स्व. बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका आणि खुल्या जागेच्या सौंदर्यीकरण अशी १५ कोटींची कामे प्रस्तावित केली आहे. शहरातील काही प्रभागात कामे राहिली. ती विकासात्मक निधी उपलब्ध होताच पूर्ण केली जातील.

नामदेव ससाने, नगराध्यक्ष, उमरखेड

कोट

शहरातील स्वच्छतेचे काम प्राधान्याने केली जात आहे. अनेक प्रभागात विकासात्मक निधीतून मोठ्या प्रमाणात कामे केली गेली. काही कामे सुरू आहेत. नवीन प्रभागात विकासात्मक निधी उपलब्ध होताच, त्या ठिकाणी कामे केली जातील. शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित सर्वच विभागांशी समन्वय करून वाढलेले अतिक्रमण काढले जाणार आहे.

चारूदत्त इंगुले, मुख्याधिकारी, उमरखेड

या समस्यांकडे द्यावे लागणार लक्ष

१) शहरातील वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. हे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे. या समस्येकडे तातडीने लक्ष देणे अपेक्षित आहे. पालिकेने संबंधितांना नोटिसा देणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यास प्रशासनाने कारवाई करण्याची अपेक्षा आहे.

२) पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मोहननगर, आनंदनगर, गोकूळनगर, महसूल कॉलनी, मतेनगर, व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर या सह अनेक प्रभागात रस्ता, नाली मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्या त्वरित मिळतील, अशी अपेक्षा आहे.