शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर

By admin | Updated: December 3, 2014 22:58 IST

मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात

रमेश झिंगरे - बोटोणीमारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हे पीक कर्ज कसे फेडावे, याची चिंता सतावत आहे़ निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने देणारे पुढारी मात्र आता शांत बसलेले दिसत आहे़कापूस पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे़ तालुक्यात खरीप हंगामात २० हजार ८५० हेक्टरवर कापूस, १६ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन, तर सहा हजार ९५० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे़ तालुक्यात गेल्या १ आॅगस्टपर्यंत २२ विविध सहकारी सोसायटींकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीन हजार ८६४ शेतकऱ्यांनी २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपये पीक कर्ज घेतले आहे़मारेगाव शाखेने नऊ सहकारी संस्थेतर्फे १ हजार ९५६ सभासदांना १३ कोटी १६ लाख ६६ हजार रूपये पीक कर्ज वाटप केले़ मार्डी शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे एक हजार २२६ शेतकऱ्यांना ७ कोटी ९९ लाख ३८ हजार, तर कुंभा शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे ६८२ शेतकऱ्यांना चार कोटी २६ लाख दोन हजारांचे कर्ज वाटप केले आहे़ मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने दगा दिला़ काहींची पेरणी साधली, तर काहींचे बियाणे उगवलेच नाही़ त्यातच सोयाबीन फुलोऱ्यावर येताच पाऊस गायब झाल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाही़ परिणामी सोयाबिनचे उत्पन्न घटने़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या़ यावर्षी मारेगाव तालुक्यात १९ आॅगस्टपर्यंत ९५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णत: गेला आहे़ गेल्यावर्षी कापसाला प्रती क्विंटल सरासरी किमान ४ हजार ८५० रूपये भाव मिळाला होता. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने १४ फेब्रुवारीपर्यंत तब्बल १ लाख ३६ हजार २६२़ क्विंटल कापूस खरेदी केला होता़ यावर्षी मात्र शासनाने भाव कमी दिल्याने व खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याने केवळ उद्घाटनप्रसंगीच कापूस खरेदी झाली़ आता कापसाचे भाव पुन्हा घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे़ मारेगाव तालुक्यात खरिपाची सुधारीत पैसेवारी ४३ टक्क्यांवर स्थिरावली आहे़ या पैसेवारीने तालुक्यात दुष्काळस्थिती असल्याचे संकेत संकेत दिले आहे़ अंतिम पैसेवारी १५ जानेवारीला जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे त्यात मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी अद्याप आवाज उठविलेला नाही़ आता शेतकऱ्यांना केवळ पीक विम्याची आशा आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे़ व्यापारी कापूस आणि सोयाबीनचे मनमानी दर ठरवीत आहे़ शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, बियाण्यांची पेरणी केली़ मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने अनेकांची पेरणी उलटली आहे़ दुष्काळाचे अस्मानी संकट बघता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़