शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

कोट्यवधींचे कर्ज डोक्यावर

By admin | Updated: December 3, 2014 22:58 IST

मारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात

रमेश झिंगरे - बोटोणीमारेगाव तालुक्यातील तीन हजार ८६४ शेतकऱ्यांकडे तब्बल २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपयांचे पीक कर्ज आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने हे कर्ज वाटप केले आहे. आता दुष्काळाच्या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हे पीक कर्ज कसे फेडावे, याची चिंता सतावत आहे़ निवडणुकीपूर्वी विविध आश्वासने देणारे पुढारी मात्र आता शांत बसलेले दिसत आहे़कापूस पिकविणारा तालुका म्हणून मारेगाव तालुक्याची ओळख आहे़ तालुक्यात खरीप हंगामात २० हजार ८५० हेक्टरवर कापूस, १६ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन, तर सहा हजार ९५० हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयीकृत बँक तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे़ तालुक्यात गेल्या १ आॅगस्टपर्यंत २२ विविध सहकारी सोसायटींकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीन हजार ८६४ शेतकऱ्यांनी २५ कोटी ४२ लाख सहा हजार रूपये पीक कर्ज घेतले आहे़मारेगाव शाखेने नऊ सहकारी संस्थेतर्फे १ हजार ९५६ सभासदांना १३ कोटी १६ लाख ६६ हजार रूपये पीक कर्ज वाटप केले़ मार्डी शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे एक हजार २२६ शेतकऱ्यांना ७ कोटी ९९ लाख ३८ हजार, तर कुंभा शाखेने सहा सहकारी संस्थेतर्फे ६८२ शेतकऱ्यांना चार कोटी २६ लाख दोन हजारांचे कर्ज वाटप केले आहे़ मात्र यावर्षी सुरूवातीपासून पावसाने दगा दिला़ काहींची पेरणी साधली, तर काहींचे बियाणे उगवलेच नाही़ त्यातच सोयाबीन फुलोऱ्यावर येताच पाऊस गायब झाल्याने सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाही़ परिणामी सोयाबिनचे उत्पन्न घटने़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या़ यावर्षी मारेगाव तालुक्यात १९ आॅगस्टपर्यंत ९५३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून पूर्णत: गेला आहे़ गेल्यावर्षी कापसाला प्रती क्विंटल सरासरी किमान ४ हजार ८५० रूपये भाव मिळाला होता. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने १४ फेब्रुवारीपर्यंत तब्बल १ लाख ३६ हजार २६२़ क्विंटल कापूस खरेदी केला होता़ यावर्षी मात्र शासनाने भाव कमी दिल्याने व खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याने केवळ उद्घाटनप्रसंगीच कापूस खरेदी झाली़ आता कापसाचे भाव पुन्हा घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे़ मारेगाव तालुक्यात खरिपाची सुधारीत पैसेवारी ४३ टक्क्यांवर स्थिरावली आहे़ या पैसेवारीने तालुक्यात दुष्काळस्थिती असल्याचे संकेत संकेत दिले आहे़ अंतिम पैसेवारी १५ जानेवारीला जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे त्यात मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी अद्याप आवाज उठविलेला नाही़ आता शेतकऱ्यांना केवळ पीक विम्याची आशा आहे. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे़ व्यापारी कापूस आणि सोयाबीनचे मनमानी दर ठरवीत आहे़ शेतकऱ्यांनी रबी हंगामात गहू, हरभरा, बियाण्यांची पेरणी केली़ मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने अनेकांची पेरणी उलटली आहे़ दुष्काळाचे अस्मानी संकट बघता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे़