शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

राळेगाव मतदारसंघाला ‘सीएम’कडून मोठ्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:18 IST

आदिवासी बहुल, मागास आणि मानव विकास निर्देशांकात बºयाच खाली असलेल्या राळेगाव विधानसभा क्षेत्रात काही महत्वपूर्ण, मुलभूत समस्या भेडसावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या विधानसभा क्षेत्रात मागील तीन वर्षात तिनदा दौरा झाला.

ठळक मुद्देविविध समस्या : चौथा दौरा दिलासा देणारा ठरावा

के.एस.वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आदिवासी बहुल, मागास आणि मानव विकास निर्देशांकात बऱ्याच खाली असलेल्या राळेगाव विधानसभा क्षेत्रात काही महत्वपूर्ण, मुलभूत समस्या भेडसावत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या विधानसभा क्षेत्रात मागील तीन वर्षात तिनदा दौरा झाला. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यानंतर या क्षेत्राला बरेच काही मिळालेले आहे. रविवार २४ डिसेंबरच्या चौथ्या दौऱ्यातही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा नागरिकांना आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने विविध केंद्रीय सिंचन प्रकल्पासह अनेक गोष्टी मिळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.बेंबळा मुख्य कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण केवळ ६५ किलोमीटर झाले आहे. तितकेच अद्यापही होणे बाकी आहे. त्यामुळे मारेगावपर्यंत यातून जाणारे पाणी ठिकठिकाणी मुरते. एकीकडे पाण्याचे नुकसान होते तर दुसरीकडे शेतजमिनीत ओल धरून राहते. याच बरोबर आष्टा उपवितरिकेसह विविध उपवितरिकांची कामे निकृष्ट झाली आहे. यात हजारों शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत पाणी जाते. पाणी मुरते व शेतातील पिके नष्ट होत राहिली आहे. यातील दोषींवर कारवाई करण्याची व राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्याची आवश्यकता आहे.राळेगाव तालुक्यात कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर क्षेत्रात आणि दुसरीकडे वडनेर (ता. हिंगणघाट) मार्गावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. आगामी काळात याक्षेत्रातून वेगवान वाहतूक सुरू होणार आहे. या रस्त्यांचा लाभ स्थानिक स्तरावर शेतकरी, नागरिक, बेरोजगारांना मिळावा यासाठी तीनही तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्याची नितांत गरज आहे. त्याचबरोबर कापसावर आधारित एखादा मोठा उद्योग या क्षेत्रात यावा याकरीता उत्सूक उद्योजकांना, कंपन्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे.आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. त्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना खरीप, रब्बी, उन्हाळी कोणती पिके घ्यावी, कोणता भाजीपाला, फळझाडे लावावी याबाबत मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात प्रयत्न करू शकणाºया कृषी अधिकाऱ्याची याठिकाणी आवश्यकता आहे.पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करून द्याबाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरण, कळंबचे चिंतामणी मंदिर, राळेगाव तालुक्यातील रावेरीचे सीता मंदिर याठिकाणी उच्च दर्जाच्या मूलभूत पर्यटन सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.वाघामुळे जीवन जगणे कठीणराळेगाव, कळंब, पांढरकवडा या परिसरातील १५-२० गावात वाघाने उच्छाद मांडला आहे. गावकऱ्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. आतापर्यंत नऊ बळी या वाघाने घेतला आहे. वनविभागाचे प्रयत्न अद्यापही यशस्वी झालेले नाही. याकरीता आणखी उचित कारवाईची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.