शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भूमिपूजनांनी मतदारांच्या डोळ्यात धूळ फेक

By admin | Updated: August 31, 2014 00:05 IST

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील आमदारांनी भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला आहे. एकाच दिवशी दीड ते दोन डझन भूमिपूजने उरकण्याचा विक्रमही काही आमदारांच्या नावे झाला आहे.

आमदारांची खेळी : केवळ प्रशासकीय मान्यता, निधीचा पत्ता नाही, कंत्राटदारांचीही पाठ राजेश निस्ताने -यवतमाळ ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील आमदारांनी भूमिपूजनांचा सपाटा सुरू केला आहे. एकाच दिवशी दीड ते दोन डझन भूमिपूजने उरकण्याचा विक्रमही काही आमदारांच्या नावे झाला आहे. हा विक्रम तोडण्यासाठीही काहींची धडपड सुरू आहे. परंतु यातील कित्येक भूमिपूजनांच्या माध्यमातून चक्क मतदारांच्या डोळ्यात उघडपणे धूळ फेक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सार्वजनिक बांधकाम, नियोजन आणि वित्त विभागातील यंत्रणेशी केलेल्या चर्चेअंती उघड झाला आहे. सध्या प्रत्येकच विधानसभा मतदारसंघात आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भूमिपूजने केली जात आहेत. आतापर्यंत सतत मुंबईत वावरणारे आणि शोधूनही मतदारांना न सापडणारे आमदार चक्क गावागावांमध्ये सहज उपलब्ध होऊ लागले आहेत. हेच आमदार मतदारांशी कधीनव्हे ते प्रेमाने बोलताना दिसत आहेत. आतापर्यंत दुर्लभ झालेले आमदारांचे दर्शन आगामी निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या भूमिपूजनांमुळे होऊ लागले आहे. दररोज कुठे ना कुठे आमदारांच्या हस्ते भूमिपूजनाचे ‘सोपस्कार’ पार पडत आहेत. भूमिपूजनांचा पडणारा पाऊस पाहता गेली साडेचार वर्ष या आमदारांनी नेमके काय केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागेल त्याला रस्ता, नाल्या, समाज मंदिर अशी सध्याची आमदारांची भूमिका आहे. पाहिजे तेथे या सोईसुविधा देऊन तत्काळ भूमिपूजनही उरकले जात आहे. परंतु अनेक आमदार या माध्यमातून मतदारांची दिशाभूल करीत असून त्यांच्या डोळ्यात धूळ फेक सुरू आहे. ज्या कामांचे भूमिपूजन केले जात आहे ते प्रत्यक्षात होणार की नाही, याबाबतच साशंकता आहे. कारण या कामांना केवळ प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी निधीची तरतूद होईलच याची हमी नाही. १० टक्के निधीची तरतूद झाल्याशिवाय कोणत्याही कामाची निविदा काढता येत नाही. निधीची तरतूद न झाल्याने आजही डीपीसी, जिल्हा परिषद, शासनाचे विविध विभागांच्या ‘बजेट बुकलेट’मध्ये शेकडो कामे गेल्या कित्येक वर्षांपासून पडून आहेत. या कामांनाही निधीची प्रतीक्षा आहे. विशेष असे, या कामांचेसुद्धा कधीकाळी भूमिपूजन पार पडले होते. मात्र दुसरी निवडणूक येऊनसुद्धा कामे पूर्ण झाली नाहीत, अशी स्थिती आहे. भविष्यात निधीची तरतूद होईलच असे सांगून भूमिपूजनाद्वारे कामाचे आत्ताच श्रेय लाटले जात आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भूमिपूजने होत असली तरी कुणीही कंत्राटदार ही कामे घेण्यास तयार नाहीत. कारण वर्षानुवर्षे निधीची तरतूदच होत नाही. कंत्राटदार स्वत:जवळील पैसा लावून बसतो. मात्र कामाच्या देयकासाठी त्याला कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. त्यामुळे कंत्राटदारांनी निधीची तरतूद नसलेल्या या भूमिपूजनामधील अनेक कामांवर जणू अघोषित बहिष्कारच घातला आहे. जिल्ह्यात बहूतांश कंत्राटदार आधीच आर्थिक संकटात आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्यांची सुमारे १०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. कारण शासनाने पैसाच दिलेला नाही. जुनी देयके थकीत असताना नवीन कामे घ्यायची कशासाठी, असा कंत्राटदारांचा रास्त सवाल आहे. कामांचे अनेक ठिकाणी भूमिपूजन व्हावे, ठिकठिकाणी फलके लागावी, विकासाचा देखावा निर्माण व्हावा, पक्षातील कार्यकर्त्यांना कामांच्या कंत्राटाचे गाजर दाखविता यावे, रोजगार निर्माण केल्याचे चित्र दिसावे म्हणून काही आमदार एकाच कामांचे अनेक तुकडे पाडत असल्याचेही प्रकार पुढे आले आहे. दहा किलोमीटरचा रोड करायचा असेल तर प्रत्येक दोन किलोमीटरवर त्याची विभागणी करून नवे काम दाखविले जाते. अर्थात तेथे नवे भूमिपूजन आणि नवे नामफलक लावले जाते. भूमिपूजनांच्याआड सरसकट मतदारांची बोळवण आणि दिशाभूल जिल्हाभर सुरू आहे.अशी आहे कामांच्या मंजुरीची शासकीय पद्धतनियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वित्त विभागाशी चर्चा करून सदर प्रतिनिधीने विकास कामांच्या मंजुरीची नेमकी पद्धत काय, ही बाब जाणून घेतली. शासनाचे विविध विभाग कामांचे प्रस्ताव सादर करतात. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणजे हे काम घेता येऊ शकते, असा अर्थ होतो. अशा कामांवर दहा टक्के निधीची तरतूद झाल्याशिवाय टेंडर काढू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. प्रशासकीय मंजुरी मिळालेली कामे त्या त्या विभागाच्या ‘बजेट बुकलेट’मध्ये समाविष्ठ केली जातात. मात्र निधीची तरतूद न झाल्यास वर्षानुवर्ष ही कामे बुकलेटमध्येच पडून असतात. कित्येकदा अशा कामांची किंमत वाढल्यास पुन्हा प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. परंतु ही मान्यता मिळाली म्हणजे काम होईलच अशी हमी नाही. कित्येकदा आमदार बदलल्यास किंवा कामाची आवश्यकता-उपयुक्तता नसल्यास त्यात बदलही केला जातो. एकाच कामाचे अनेकदा भूमिपूजन झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत. एकूणच भूमिपूजन झालेली अनेक कामे केवळ आमदाराला मतदारांच्या नजरेत ‘क्रेडीट’ मिळवून देतात, एवढे निश्चित. निवडणुकांमुळे आमदारांमध्ये आपल्या मतदारसंघात अधिकाधिक निधी खेचून नेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला काठावर ठेवत पालकमंत्र्यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे.