शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

शेतकऱ्यांसाठीच भाऊसाहेबांचा लढा

By admin | Updated: December 27, 2015 02:48 IST

शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला.

प्रवीण भोयर : नेर येथे जयंती उत्सव व स्नेहसंमेलननेर : शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शैक्षणिक क्षेत्रातच नव्हेतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविला. भारतातील शेतकरी अत्यंत दयनीय अवस्थेत जगत आहे. येथील व्यवस्थेने त्याचे अतोनात शोषण केले. हे जाणून भाऊसाहेबांनी वैश्विक दृष्टिकोन ठेवून जगातील शेतकरी सुखी व्हावा, यासाठी लढा दिला, असे प्रतिपादन प्रा.प्रवीण भोयर यांनी केले. स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्रेहसंमेलनात प्रमुख वक्ते म्हणून प्रा.भोयर बोलत होते. भाऊसाहेब हे दूरदृष्टीचे सामाजिक जाण व भान असलेले नेते होते. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी जागतिक स्तरावर कृषी प्रदर्शन आयोजित केले व महासत्ता असलेल्या राष्ट्रप्रमुखांना एकत्र आणून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण संस्थांची स्थापना, देवस्थान बिल, डॉ.आंबेडकरांच्या आवाहनावरून अंबादेवी मंदिर मुक्ती लढा असे उत्तुंग कार्य भाऊसाहेबांनी केले, असे प्रा.भोयर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबू पाटील जैत होते. शेतकऱ्यांनी एकत्र येवून लढा देणे गरजेचे आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे हीच भाऊसाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मनोगत जैत यांनी व्यक्त केले. विचारपीठावर नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय वानखडे, मधुकरराव बोबडे, उत्तमराव ठाकरे, सुधीर माळवे, सुभाष ठाकरे, अनिल मिसाळ, कमलेश चरडे, तेजस नाव्हे, आकांक्षा जुमळे उपस्थित होते. यावेळी शालांत परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. विज्ञान प्रदर्शन, पाककला प्रदर्शन, पुष्प प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रशेखर आगलावे तर सूत्रसंचालन गिरीश कनाके यांनी केले. आभार किशोर चव्हाण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)