शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

गावाच्या विकासासाठी लढा देणारी भानसराची रणरागिणी जिजाबाई

By admin | Updated: March 8, 2015 02:06 IST

राजकीय क्षेत्रात महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी कारभार मात्र घरातील पुरूषच सांभाळतो, असा सर्वत्र अनुभव असतो.

हरिओम बघेल आर्णीराजकीय क्षेत्रात महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी कारभार मात्र घरातील पुरूषच सांभाळतो, असा सर्वत्र अनुभव असतो. महिलांना आजही चूल आणि मूल एवढेच सिमीत करणारे महाभाग कमी नाही. परंतु आर्णी तालुक्यातील भानसराच्या सरपंच जिजाबाई धुर्वे त्याला अपवाद आहेत. गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या ठिकाणच्या शासकीय कार्यालयात जाऊन विनंती करणारी आणि वेळप्रसंगी लढा देणारी ही महिला आहे. आपल्या नेतृत्व गुणाच्या भरोशावर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासाची पहाट आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आर्णी तालुक्यातील भानसरा हे चिमुकले गाव. विकासापासून कोसो दूर, याच गावात असणाऱ्या जिजाबाई धुर्वे यांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत होती. त्यांनी गावातील महिलांचे संघटन सुरू केले. बचत गटाच्या माध्यातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र गावात असलेली दारू यात अडसर ठरत होती. त्यामुळेच त्यांनी दारुबंदीसाठी महिलांना प्रोत्साहीत केले. महिलांच्या सहकार्याने भानसरात दारुबंदी केली. त्यांची ही तळमळ पाहून त्यांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत पाठविले. दुसऱ्या पंचवार्षीकमध्ये गावकऱ्यांच्या विश्वासावर निवडून आल्या. त्यानंतर त्यांना उपसरपंच म्हणून संधी मिळाली. यावेळी त्यांनी गाव तंटामुक्त करण्याचा विडा उचलला. प्रत्येक कार्यालयात जाऊन गावाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू केला. गावाच्या विकासासाठी झटणारी ही महिला अल्पावधीतच परिसरातही लोकप्रीय झाली. गावाचा विकास होत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी त्यांना तिसऱ्यांदा निवडूनच दिले नाही तर सरपंचपदी विराजमान केले. त्यांच्या कार्याची ही पावतीच होती. आता गावाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. तालुक्यात इतरही गावात महिला सरंपच आहेत. परंतु गावाच्या विकासासाठी पुरूषांच्या बरोबरीने शासकीय कार्यालयात जाऊन लढा देणाऱ्या एकमेव महिला म्हणजे जिजाबाई होय. पुरूषांची मक्तेदारी खोडीत काढत स्वत:च गाव विकासाची सुत्रे हातात घेतली. गावाचा विकास होत असून, गावकऱ्यांचाही त्याच्यावर तेवढाच विश्वास आहे. महिलांनी प्रामणिकपणे काम केले तर गावकरी त्यावर विश्वास ठेवतात असे जिजाबाई सांगतात. सध्या जिजाबाई परिसरात रणरागिणी म्हणूनच ओळखली जाते.