अधिकमासातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्व असते. त्यामुळेच कळंब येथे चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांचा जनसागर उसळला होता. रात्री १२ वाजतापासूनच दर्शनाच्या लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. मंदिरापासून थेट गांधी चौकापर्यंत शिस्तबद्ध रांगा दिसत होत्या. हजारो भाविकांनी चिंतामणीचे मनोभावे दर्शन घेतले. भाविकांसाठी संस्थानसोबतच नागरिकांनीही पिण्याचे पाणी, चहा, फराळाची व्यवस्था केली होती. चिंतामणीच्या गजराने कळंबनगरी दुमदुमून गेली होती.
चिंतामणी दर्शनासाठी भक्तसागर उसळला
By admin | Updated: July 6, 2015 02:44 IST