शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

नोटा बंदीने भाजीबाजार गडगडला

By admin | Updated: November 17, 2016 01:25 IST

नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे.

उलाढाल अर्ध्यावर : पर जिल्ह्यातील आवक थांबलीयवतमाळ : नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या आदेशाने कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. नगदी पीक आणि तत्काळ हातात पैसा म्हणून भाजीपाल्याची लागवड होते. जिल्ह्यात भाजीपाल्याखाली १५ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या ठिकाणावरून जिल्ह्यासह परजिल्हा आणि विविध भाजीबाजारात भाजीपाला वितरीत होतो. जिल्हा मुख्यालयाची ही उलाढाल ५० टनाची आहे. यातून दर दिवसाला सात लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री होते.नोटाबंदीचा आदेश जाहीर होताच भाजीमंडीला करकचून ब्रेक लागले. ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा सरकारने बंद केल्या. पूर्वी या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या गेल्या. मात्र दोन दिवसांपासून या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला बंदी घालण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेल्या शेतमालाचे जुने पैसे हातात आले तरी, बँकेत जमा करता येणार नाही. यामुळे जुने चलन स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे जमा झालेल्या मोजक्या पैशाचाच भाजीपाला विकत घेतला जात आहे. यातून भाजीबाजार पूर्णत: संकटात सापडला आहे. विक्रीस येणाऱ्या शेतमालापैकी अर्धाअधिक शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. दररोज होणारी सात लाख रुपयांची उलाढाल दोन लाखांपर्यंत खाली आली आहे. (शहर वार्ताहर)व्यापारी धास्तावलेजवळ असलेले पैसे, काही उधारी आणि काही जुन्या नोटा यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. आता सहकारी बँकांमधील जुन्या नोटांचा व्यवहार थांबविण्यात आला आहे. शेतकरी जुन्या नोटा स्वीकारत नाही. त्यामुळे दररोजचा व्यवहार करायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. किमान व्यवहारासाठी विड्रॉलची रक्कम वाढवायला हवी, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना रक्कम देणे शक्य होईल, असे मत हमीदखॉ पठाण यांनी व्यक्त केले.भाजीपाला लागवडीचा खर्चही निघेनासध्या भाजीपाल्याचे ठोक दर शेतकऱ्यांच्या शेतीच्या खर्चालाही न परवडणारे आहे. मेथी ८ ते १५ रूपये किलो, शिमला १५ , मिरची १२, फुलकोबी ८ ते १०, पानकोबी ६ , पालक १०, वांगे ५ , टमाटर १०, काकडी ६, चवळी १०, भेंडी १२ आणि सांभार ४० रुपये किलो दराने खरेदी केला जात आहे.