शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नोटा बंदीने भाजीबाजार गडगडला

By admin | Updated: November 17, 2016 01:25 IST

नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे.

उलाढाल अर्ध्यावर : पर जिल्ह्यातील आवक थांबलीयवतमाळ : नोटा बंदीच्या आदेशाने भाजीपाल्याची उलाढाल अर्ध्यावर आली आहे. मंदिच्या लाटेने भाजीबाजार गडगडल्याने परजिल्ह्यातील आवकही थांबली आहे. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या आदेशाने कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. नगदी पीक आणि तत्काळ हातात पैसा म्हणून भाजीपाल्याची लागवड होते. जिल्ह्यात भाजीपाल्याखाली १५ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. या ठिकाणावरून जिल्ह्यासह परजिल्हा आणि विविध भाजीबाजारात भाजीपाला वितरीत होतो. जिल्हा मुख्यालयाची ही उलाढाल ५० टनाची आहे. यातून दर दिवसाला सात लाख रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री होते.नोटाबंदीचा आदेश जाहीर होताच भाजीमंडीला करकचून ब्रेक लागले. ५०० आणि १००० रुपयांच्या चलनी नोटा सरकारने बंद केल्या. पूर्वी या नोटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्वीकारल्या गेल्या. मात्र दोन दिवसांपासून या नोटा स्वीकारण्यास जिल्हा बँकेला बंदी घालण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांकडून खरेदी झालेल्या शेतमालाचे जुने पैसे हातात आले तरी, बँकेत जमा करता येणार नाही. यामुळे जुने चलन स्वीकारण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.नवीन चलन उपलब्ध नाही. यामुळे जमा झालेल्या मोजक्या पैशाचाच भाजीपाला विकत घेतला जात आहे. यातून भाजीबाजार पूर्णत: संकटात सापडला आहे. विक्रीस येणाऱ्या शेतमालापैकी अर्धाअधिक शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. दररोज होणारी सात लाख रुपयांची उलाढाल दोन लाखांपर्यंत खाली आली आहे. (शहर वार्ताहर)व्यापारी धास्तावलेजवळ असलेले पैसे, काही उधारी आणि काही जुन्या नोटा यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. आता सहकारी बँकांमधील जुन्या नोटांचा व्यवहार थांबविण्यात आला आहे. शेतकरी जुन्या नोटा स्वीकारत नाही. त्यामुळे दररोजचा व्यवहार करायचा कसा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. किमान व्यवहारासाठी विड्रॉलची रक्कम वाढवायला हवी, असे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना रक्कम देणे शक्य होईल, असे मत हमीदखॉ पठाण यांनी व्यक्त केले.भाजीपाला लागवडीचा खर्चही निघेनासध्या भाजीपाल्याचे ठोक दर शेतकऱ्यांच्या शेतीच्या खर्चालाही न परवडणारे आहे. मेथी ८ ते १५ रूपये किलो, शिमला १५ , मिरची १२, फुलकोबी ८ ते १०, पानकोबी ६ , पालक १०, वांगे ५ , टमाटर १०, काकडी ६, चवळी १०, भेंडी १२ आणि सांभार ४० रुपये किलो दराने खरेदी केला जात आहे.