शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

देशासाठी सौर ऊर्जा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:25 IST

भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्दे कमलसिंह : कुलगुरू के.जी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. त्यातही सौर ऊर्जा हा देशासाठी उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन जी. एस. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंह यांनी केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात आयोजित अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्यांनी ‘अपारंपारिक ऊर्जा स्रोत व उपाययोजना’ या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, डॉ. कमल देशमुख, डॉ. श्रीनिवास ओमनवार, दीपक आसेगावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, प्राचार्य डॉ. संजीव मोटके उपस्थित होते.यावेळी डॉ. कमलसिंह यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल विद्युत, जैविक ऊर्जा यावर सादरीकरण करून अपारंपारिक ऊर्जा स्रोतांची माहिती दिली. या ऊर्जेमुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यापासून पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सुरूवातीला अमरावती विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. विलास नांदूरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. मोटके यांनी करून दिला. प्रथम कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख यांच्या कार्याचा आलेख सादर केला. डॉ. कमल देशमुख यांनी त्यांचे पती हाडाचे शिक्षक होते, असे सांगून ज्ञान हे त्यांचे ब्रिद असल्याचे सांगितले. संचालन प्रा. विलास भवरे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एच. बी. नानवाला, प्रा. डॉ. विश्वजित ठाकरे, प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले, प्रा. के. जी. कडस्कर, प्रा. डॉ. अविनाश वानखेडे, प्रा. गोविंद फुके, प्रा. राजेश पाचकोर, प्रा. हाटे, माजी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपप्राचार्य अप्पाराव चिरडे, पर्यवेक्षक प्रा. दिनकर गुल्हाने आदी उपस्थित होते.