शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

देशासाठी सौर ऊर्जा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 21:25 IST

भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्दे कमलसिंह : कुलगुरू के.जी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक ऊर्जा वापरणारा देश आहे. औष्णिक व जलविद्युत ऊर्जेवर भारताला अवलंबून राहावे लागते. भविष्यातील ऊर्जेचे संकट टाळण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. त्यातही सौर ऊर्जा हा देशासाठी उत्तम पर्याय असल्याचे प्रतिपादन जी. एस. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंह यांनी केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात आयोजित अमरावती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. त्यांनी ‘अपारंपारिक ऊर्जा स्रोत व उपाययोजना’ या विषयावर विचार मांडले. अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, डॉ. कमल देशमुख, डॉ. श्रीनिवास ओमनवार, दीपक आसेगावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, प्राचार्य डॉ. संजीव मोटके उपस्थित होते.यावेळी डॉ. कमलसिंह यांनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जल विद्युत, जैविक ऊर्जा यावर सादरीकरण करून अपारंपारिक ऊर्जा स्रोतांची माहिती दिली. या ऊर्जेमुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच ही ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्यापासून पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सुरूवातीला अमरावती विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. विलास नांदूरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. मोटके यांनी करून दिला. प्रथम कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख यांच्या कार्याचा आलेख सादर केला. डॉ. कमल देशमुख यांनी त्यांचे पती हाडाचे शिक्षक होते, असे सांगून ज्ञान हे त्यांचे ब्रिद असल्याचे सांगितले. संचालन प्रा. विलास भवरे यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. एच. बी. नानवाला, प्रा. डॉ. विश्वजित ठाकरे, प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले, प्रा. के. जी. कडस्कर, प्रा. डॉ. अविनाश वानखेडे, प्रा. गोविंद फुके, प्रा. राजेश पाचकोर, प्रा. हाटे, माजी नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपप्राचार्य अप्पाराव चिरडे, पर्यवेक्षक प्रा. दिनकर गुल्हाने आदी उपस्थित होते.