शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बंगाली सुवर्णकार, गलाईवाले आता पोलिसांचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:37 IST

चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे.

ठळक मुद्देसराफाव्यापाºयांना एकजुटीचा फायदा : जप्ती ६०० ग्रॅम सोन्याची, दाखविली केवळ ११८ ग्रॅम

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चोरीतील सोन्याच्या जप्तीसाठी सराफ व्यापाºयांची एकजूट अडसर ठरत असल्याचे पाहून पोलिसांनी आता कोणतेही संघटन नसलेल्या बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांना टार्गेट बनविणे सुरू केले आहे. नुकत्याच झालेल्या मंगळसूत्र चोरीतील जप्तीप्रकरणाने ही बाब उघड झाली आहे.सराफ, सुवर्णकार बांधवांची असोसिएशन आहे. त्यांच्यावर कोणतेही संकट आल्यास ते सामूहिकपणे वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करतात. एखाद्या चोराने कुण्या सुवर्णकार-सराफाचे दुकान दाखवून तेथे सोने विकल्याचे सांगितल्यास पोलिसांना सहजासहजी या दुकानातून जप्ती करता येत नाही. व्यापारी थेट एसपी, महानिरीक्षकांपर्यंत जातात. राज्यभरातील सराफ-सुवर्णकार एकत्र येतात. त्यामुळे पोलिसांच्याच मागे डोकेदुखी लागते. या सर्व प्रकारातून पोलिसांनी आता नवा पर्याय शोधला आहे. बंगाली सुवर्णकार, सोन्याची गलाई करणाºयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कारण त्यांची कोणतीही युनियन नाही, त्यांच्यासाठी सराफ-सुवर्णकार रस्त्यावर उतरत नाहीत. या बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांना एक-एकटे गाठून त्यांच्याकडून चोरीतील सोन्याची जप्ती करणे सहज शक्य होते. पोलिसांचा हा नवा फंडा नुकताच अनुभवास मिळाला.एका अट्टल मंगळसूत्र चोराला सकाळी ७ वाजता सराफा बाजारातील एका गलाईवाल्याकडे सोने आटविताना रंगेहात पकडण्यात आले. त्याने मध्यस्थ असलेल्या एका सुवर्ण कारागिराचे नाव उघड केले. हा कारागिर व चोराला ‘बाजीराव’ दाखवित पोलिसांनी सहा ते आठ बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांकडून सुमारे दहा गुन्ह्यातील सोन्याची जप्ती केली. हा आकडा ६०० ग्रॅमवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात पोलिसांनी ११८ ग्रॅमचीच जप्ती रेकॉर्डवर दाखविली आहे. विशेष असे चोर व गलाईवाल्यामध्ये मध्यस्थी करणाºया त्या सुवर्ण कारागिराला आरोपी बनविले गेले नाही. शिवाय चोरीतील सोने घेतल्याचा आरोप असलेल्या बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांनाही आरोपी बनविण्यात आले नाही. त्यासाठी मोठी ‘उलाढाल’ केली गेली.सराफा बाजारातूनच पोलिसांना टीप !यातील बहुतांश बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांनी चोरीतील सोने घेतलेले नाही, केवळ ‘बाजीराव’चा प्रसाद वाचविण्यासाठी त्यांनी जप्ती दिल्याचे सांगितले जाते. ही कारवाई एकाचवेळी न करता प्रत्येक दोन दिवसाने करण्यात आली. त्यामुळे कुणाकडून किती जप्त झाले, याची सराफा बाजारात कुणालाच खबरबात नव्हती. विशेष असे बंगाली सुवर्णकार व गलाईवाल्यांमधील ‘सक्षम’ नावांची टीप सराफा बाजारातूनच कुण्या मुखबिराने पोलिसांना दिल्याचा संशय आहे.