शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तीन कोटींचा लाभ

By admin | Updated: March 31, 2016 03:02 IST

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पीक विम्यापोटी तब्बल ३ कोटी १९ लाख ५२ हजार १६२ रूपये मिळणार आहे.

पीक विमा : बोटोणी मंडळाला सर्वाधिक लाभबोटोणी : मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित पीक विम्यापोटी तब्बल ३ कोटी १९ लाख ५२ हजार १६२ रूपये मिळणार आहे. यात कापूस व सोयाबीन पिकाचा समावेश आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून या बोटोणी मंडळातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ झाला आहे.‘मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा’, या मथळ्याखाली गेल्या महिन्यात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. यावर्षी कमी पडलेला पाऊस व निसर्गाच्या लहरीपणामुळे बोटोणी परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फटका बसला. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर शासनाने दखल घेत मारेगाव तालुक्यात कापूस व सोयाबीन पिकाला हवामान आधारित पीक विमा लागू केला. तालुक्यात कुंभा, मार्डी, मारेगाव, वनोजा, बोटोणी असे पाच महसूल मंडळ आहे. ५ हजार ७८६ कर्जदार शेतकऱ्यांनी सहा हजार ९९६.७६ हेक्टर क्षेत्राकरिता कापूस व सोयाबीन, तर १३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी १३.९० हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविला होता. खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये कुंभा १४८४, मार्डी ९१२, मारेगाव १५१४, वनोजा ११९०, बोटोणी या मंडळातील पाच हजार ७८६ कर्जदार शेतकरी, तर मारेगाव सहा, वनोजा दोन, बोटोणी पाच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेत विम्याची रक्कम जमा केली. गेल्यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. निसर्गाच्या लहरीपणामुळे व बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. दिवाळी दरम्यान पाऊस गायब झाल्याने कापसाचे व सोबिनचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी चिंतातूर होते. हवामान आधारित पीक विमा खरिपाकरिता लागू झाला आहे. यात सर्वाधिक लाभ बोटोणी मंडळातील कापूस पिकाला मिळाला. प्रति हेक्टर ६ हजार १६५, तर सोयाबीन पिकाला प्रति हेक्टर १ हजार ५३८ रूपये दर लागू झाला आहे. (वार्ताहर)