शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मानकर, पुरके आणि उईके गटही खूश

By admin | Updated: July 6, 2016 02:51 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाने तिनही गट खूश असल्याचे दिसून येत आहे. या मागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे.

राळेगाव बाजार समिती : भविष्यातील राजकीय समिकरणेके.एस. वर्मा राळेगावस्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाने तिनही गट खूश असल्याचे दिसून येत आहे. या मागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहे. भविष्यातील घडामोडी आणि समिकरणांच्यादृष्टीने बाजार समितीच्या निकालाकडे पाहिले जात आहे. या संस्थेवर अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर गटाने १८ पैकी १४ जागा जिंकून सत्ता पुन्हा ताब्यात ठेवली. प्रा. वसंत पुरके गटाने ग्रामपंचायतीच्या केवळ चार जागा जिंकून विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त केले. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके गटाला एकही जागा मिळाली नसली तरी हा गट खूश आहे. मानकर गटाने पुरके गटाला सहा जागा निवडणुकीपूर्वी तडजोडीत देऊ केल्या होत्या. संचालकापेक्षा कोणतेच अधिकचे जादा अधिकार नसतानाही उपसभापतीपद देण्यावरून झालेली बोलणी त्यावेळी फिसकटली, तशी ती व्हावी अशी दोनही गटाची त्यावेळी इच्छा नव्हती. त्या स्थितीत लागलेले निकाल सर्वांना खूश करीत असल्याचे वेगळेच आश्चर्य या समिकरणामुळे समोर आले आहे.सत्ता राहिली, सभापती, उपसभापती आपल्या गटाचे होणार म्हणून मानकर गटाची खूशी समजता येऊ शकते. पण, चार जागा जिंकूनही पुरके गट खूश राहण्याचे कारण मानकर गटाची साथ सुटल्याने आता पुढील निवडणुकात होणारी ढवळाढवळ थांबून काँग्रेस नेत्यांना आपल्या मनमर्जीप्रमाणे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना तिकीटा देता येणे शक्य होणार असल्याचे कारण आहे. आमदार उईके गटाला खाते उघडता आले नसले तरी भविष्यात पुरके व मानकर गटात या निवडणुकीत निर्माण झालेले वैषम्य आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीतील चिवट झुंजीत भाजपला मतविभाजनाचा फायदा मिळण्याची संधी-शक्यतेमुळे हा गट आतून आनंदी झाला आहे.येत्या सहा महिन्यात वसंत सहकारी जिनिंग, सहकारी मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मते मिळाली असल्याने आणि त्यामुळे चार जागा प्राप्त करता आल्या असल्याने पुरके गट आनंदी झाला. असे असले तरी वेळेवर होणारी नवी समिकरणे आणि योग्य उमेदवारांची निवड यावरही जय-पराजय अवलंबून राहणार आहे. मानकर गटाने सोसायट्यांवर फार आधीपासूनच लक्ष पुरविले होते. बँक संचालकपदाचा फायदा त्यांना मिळाला. पुरके गट नेहमीप्रमाणे मानकर गटावर विसंबून राहिल्यानेही पराभव स्वीकारावा लागला. जय-पराजयाचे अंतर कमी राहिल्याने ही चूक आता ध्यानात आली असून बँक व इतर निवडणुकीकरिता कार्यकर्त्यांना चार्जिंग करणे सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षे फिरून आल्यावरही प्रफुल्ल मानकरांना पुर्वीचे तालुक्यात फ्री हँडचे स्वातंत्र्य अपेक्षित होते. पण, गत काही वर्षात अनेक झटके प्रा. पुरके यांना बसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मानकरांची साथ सोडली. तालुक्यात आता दरवेळी यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.