शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांचा हल्ला

By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत

पिंपरी इजारातील प्रकार : प्रेत सोडून सैरावैरा धावत सुटले गावकरी, सायंकाळी झाला अंत्यसंस्कारआरिफ अली - बाभूळगाव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेतील लोकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढविला. या हल्ल्याने घाबरलेल्या नागरिकांनी प्रेत सोडून सैरावैरा धाव घेतली. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत मधमाश्यांनी पाठलाग केला. या हल्ल्यातून बचावसाठी काहींनी चक्क विहिरीत उड्या घेतल्या. हा प्रकार बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इशारा येथे शनिवारी दुपारी घडला. मधमाशा शांत झाल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. बाभूळगाव तालुक्यातील पिंपरी इजारा येथील जानराव रतन डेंबरे (६०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी अंत्यसंस्काराची तयारी झाली. बाहेरगावाहून नातेवाईक आणि गावातील आप्तस्वकीय गोळा झाले. दुपारी अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. मात्र अर्धेअंतर पार करीत नाही तोच एका वृक्षावरील पोळातून उठलेल्या मधमाश्यांनी अचानक अंत्ययात्रेवर हल्ला केला. या प्रकाराने घाबरलेल्या आप्तस्वकीय आणि नागरिकांनी प्रेत तिरडीसह रस्त्यात सोडून सैरावैरा पळ काढला. मात्र मधमाशा पाठ सोडत नव्हत्या. तब्बल दोन किलोमीटर मधमाश्यांनी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांचा पाठलाग केला. दरम्यान जीव वाचविण्यासाठी काहींनी रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत उड्या घेतल्या. या मधमाशांच्या हल्ल्यात मृत जानरावचा मुलगा संतोष जानराव डेंबरे, लहान भाऊ दिलीप रतन डेंबरे यांच्यासह प्रभा लखूपती बेंडे, सुवालाल पुनाजी तितगाव गंभीर जखमी झाले. या सर्वांच्या चेहऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला.हा प्रकार गावात माहीत होताच खळबळ उडाली. परंतु कुणाचीही हिंमत प्रेतापर्यंत जाण्याची होत नव्हती. इकडे माशांनी डंख मारल्याने प्रचंड वेदना होत असल्याने जखमींना तत्काळ बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर माशांचे शेकडो डंक होते. विशेष म्हणजे या माशा आग्या मोहळाच्या असल्याचे दिसून आले. इकडे प्रेत अर्ध्यातच होते. मात्र माशांच्या घोंगावण्यामुळे कुणाचेही तिकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. शेवटी सायंकाळी मधमाशा शांत झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मधमाशा एवढ्या कशा धावून पडल्या हे मात्र कळायला मार्ग नाही. गावात यापूर्वी असा कधीच प्रकार घडला नसल्याचे वयोवृद्ध जानकार सांगतात. सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी गावात मात्र अंत्ययात्रेवर मधमाश्यांच्या हल्ल्याचीच चर्चा दिसत आहे.