शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

शेतकर्‍यांसाठी व्यापारी ठरले कर्दनकाळ

By admin | Updated: June 4, 2014 00:23 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे

बाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकर्‍यांना माहितीही मिळत नाहीनीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात व्यापारीच शेतकर्‍यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. ते कुठेही शेतमाल खेरदी करीत असल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. मात्र बाजार समितीचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.येथील उपबाजारात शेड आणि ओट्यांची वानवा आहे. आत्तापर्यंत येथे शेड आणि ओटे बांधण्यात न आल्याने शेतकर्‍यांना आपला शेतमाल कुठे ठेवावा, असा प्रश्न पडतो. सोबतच शेतमालाच्या दरातील चढ-उतार कळत नसल्याने शेतकर्‍यांची नाडवणूक होत आहे. सुमारे तीन-चार वर्षांपूर्वी करंजी, रूंझा, मोहदा आदी ठिकाणी दोन-दोन शेड, ओटे बांधण्यात आले. मात्र लोकसंख्येने तालुक्यात सर्वात मोठे असलेल्या पाटणबोरी येथील उपबाजार समितीत शेड व ओटे आतापर्यंत बांधण्यात आले नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाला येथील उपबाजाराचा विसर पडल्याचे दिसून येते. येथे शेतकर्‍यांना शेतमालाबाबत कोणतीही माहिती विचारायची झाल्यास स्वतंत्र कक्ष नाही. बाजार समितीचा कर्मचारी नाही. कोणत्याही शेतमालाच्या भावात चढ-उतार झाल्यास शेतकर्‍यांना त्याची माहिती मिळत नाही. परिणामी शेतकर्‍यांचे नुकसान होते. त्यांना आंधळेपणाने आपला शेतमाल व्यापार्‍यांच्या घशात घालावा लागतो. व्यापारी बाजार समितीच्या प्रांगणात शेतमालाची खरेदी न करता आपल्या सोयीच्या ठिकाणी करतात. त्यातून शेतकरी नागवला जात आहे. व्यापारीच शेतमालाचा दर ठरवितात. छोट्या शेतकर्‍यांना ते परवडत नाही. मात्र त्यांना आपला शेतमाल दुसरीकडे विकण्यासाठी नेणेही परवडत नाही. त्यामुळे अखेर व्यापारी म्हणेल, त्या भावात त्यांना आपला शेतमाल नाईलाजाने त्यांच्या घशात घालावा लागतो. यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. मोठे शेतकरी व्यापार्‍यांच्या या धोरणाला कंटाळून आता शेतमाल पाटणबोरीऐवजी पांढरकवडा, हिंगणघाट, आदिलाबाद येथील बाजारपेठेत नेत आहे. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चेही प्रचंड नुकसान होत आहे.