शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
7
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
8
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
9
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
10
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
11
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
12
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
13
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
14
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
15
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
16
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
17
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
18
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
19
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
20
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या

‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रम ठरला मृगजळ

By admin | Updated: June 27, 2016 02:40 IST

शेतकऱ्यांना कर्ज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेली ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी

यवतमाळ : शेतकऱ्यांना कर्ज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेली ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरली. सव्वादोन लाख शेतकऱ्यांपैकी काही मोजकेच शेतकरी बँकांच्या शाखात पोहोचले. मात्र अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले तर निधीअभावी जिल्हा बँकेने योजनाच राबविली नाही. ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना संपूर्ण जिल्ह्यात सर्वच बँकांना राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. त्यानुसार रविवारी बँका उघड्या होत्या. १९ आणि २६ जून रोजी हा मेळावा राहणार असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे फलक मेळाव्याच्या दिवशीच लावण्यात आले. इतर दिवशी हे फलक राष्ट्रीयकृत बँकांनी काढून घेतले होते. यामुळे या योजनेची माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. सव्वा दोन लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले. मेळाव्याच्या अंतिम टप्प्यातही कर्जास पात्र शेतकरी बँकेपर्यंत पोहचले नाही. यामुळे २६ जून रोजी बहुतांश बँकांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. तर दुसरीकडे जिल्हा बँकेकडे पैसेच नसल्याने अर्ज द्या कर्ज घ्या योजनेसाठी फलक लागले नाही. बँका उघडल्या नाही. यामुळे जिल्हा बँंकेत धडकलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रशासनाचा चांगला उद्देश असला तरी राष्ट्रीयकृत बँकाची कर्ज वितरणाची मुळातूनच इच्छ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)४जिल्हा बँकेकडून या योजनेत अंतिम टप्प्यात पैसे मिळतील म्हणून काही शेतकरी २६ जूनला जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात धडकले. यावेळी कार्यालयाला कुलूप ठोकलेले होते. यामुळे शेवंता गाडेकर, वामन मंगळे, सुधाकर राऊत, श्रीराम घरडे हे शेतकरी रिकाम्या हाताने परतले. पेरणीकरिता पैसा नसल्याने पेरणी होणार कशी, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.चांगल्या उपक्रमात झारीतील शुक्राचार्य४आर्थिक विवंचनेने खरिपाच्या पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. या स्थितीत शेतकरी सावकारचे दरवाजे झिजवीत आहेत. या स्थितीत बँकांनी कर्ज देण्यास तयारी दाखविली तर प्रत्येक शेतकरी बँकेत हमखास येतो. मात्र बँंकांनी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली. जाहिरातीचे बॅनर केवळ रविवारपुरतेच परिसरात लावले होते. इतरवेळी ते दिसलेच नाही. यातून शेतकरी बँकेकडे फिरकले नाही. उलट शेतकरी कर्जास उत्सूक नसल्याचे सांगितले जात आहे. बँकांचे दुटप्पी धोरण असल्याची बाब उघड होत आहे.