शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

‘अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रम ठरला मृगजळ

By admin | Updated: June 27, 2016 02:40 IST

शेतकऱ्यांना कर्ज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेली ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी

यवतमाळ : शेतकऱ्यांना कर्ज सुलभ उपलब्ध करून देण्यासाठी राबविलेली ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरली. सव्वादोन लाख शेतकऱ्यांपैकी काही मोजकेच शेतकरी बँकांच्या शाखात पोहोचले. मात्र अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले तर निधीअभावी जिल्हा बँकेने योजनाच राबविली नाही. ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ योजना संपूर्ण जिल्ह्यात सर्वच बँकांना राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. त्यानुसार रविवारी बँका उघड्या होत्या. १९ आणि २६ जून रोजी हा मेळावा राहणार असल्याचे फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे फलक मेळाव्याच्या दिवशीच लावण्यात आले. इतर दिवशी हे फलक राष्ट्रीयकृत बँकांनी काढून घेतले होते. यामुळे या योजनेची माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. सव्वा दोन लाख शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले. मेळाव्याच्या अंतिम टप्प्यातही कर्जास पात्र शेतकरी बँकेपर्यंत पोहचले नाही. यामुळे २६ जून रोजी बहुतांश बँकांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. तर दुसरीकडे जिल्हा बँकेकडे पैसेच नसल्याने अर्ज द्या कर्ज घ्या योजनेसाठी फलक लागले नाही. बँका उघडल्या नाही. यामुळे जिल्हा बँंकेत धडकलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. प्रशासनाचा चांगला उद्देश असला तरी राष्ट्रीयकृत बँकाची कर्ज वितरणाची मुळातूनच इच्छ नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (शहर वार्ताहर)४जिल्हा बँकेकडून या योजनेत अंतिम टप्प्यात पैसे मिळतील म्हणून काही शेतकरी २६ जूनला जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात धडकले. यावेळी कार्यालयाला कुलूप ठोकलेले होते. यामुळे शेवंता गाडेकर, वामन मंगळे, सुधाकर राऊत, श्रीराम घरडे हे शेतकरी रिकाम्या हाताने परतले. पेरणीकरिता पैसा नसल्याने पेरणी होणार कशी, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.चांगल्या उपक्रमात झारीतील शुक्राचार्य४आर्थिक विवंचनेने खरिपाच्या पेरण्या अडचणीत सापडल्या आहेत. या स्थितीत शेतकरी सावकारचे दरवाजे झिजवीत आहेत. या स्थितीत बँकांनी कर्ज देण्यास तयारी दाखविली तर प्रत्येक शेतकरी बँकेत हमखास येतो. मात्र बँंकांनी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली. जाहिरातीचे बॅनर केवळ रविवारपुरतेच परिसरात लावले होते. इतरवेळी ते दिसलेच नाही. यातून शेतकरी बँकेकडे फिरकले नाही. उलट शेतकरी कर्जास उत्सूक नसल्याचे सांगितले जात आहे. बँकांचे दुटप्पी धोरण असल्याची बाब उघड होत आहे.