शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

दारूबंदीतील मध्यस्थी जीवावर बेतली

By admin | Updated: July 4, 2015 02:48 IST

दारूबंदीवरून उद्भवलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या यावली (इजारा) येथील ...

पोलीस पाटलाचा खून : चौघे पोलिसांच्या ताब्यात, यावलीत चूलही पेटली नाहीअकोलाबाजार : दारूबंदीवरून उद्भवलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या यावली (इजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड (५५) यांना आपला जीव गमवावा लागला. वीरेंद्र यांचा दगडाने ठेचून खून केला गेला. वीरेंद्र यांच्या खुनात पोलिसांनी यावली पोडावरील महादेव टेकाम (३०), डोमा शिवणकर (३०), भगवान शिवणकर (५०), हुसेन आत्राम (३५), सुरेश आडे संशयित म्हणून यांना ताब्यात घेतले. वीरेंद्र हे गेल्या दहा वर्षांपासून दारूबंदी चळवळीत सक्रिय होते. गुरुवारी रात्री गावातील पोडावर दारूतूनच वाद पेटला. या वादात मध्यस्थीसाठी त्यांना बोलविले गेले. त्यांनी वाद मिटविलासुद्धा. मात्र हीच मध्यस्थी त्यांच्या जीवावर बेतली. घराकडे निघाले असताना त्यांचा दगडाने ठेचून खून केला गेला. त्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयावर प्रेतासह मोर्चा वळविला. यावलीतील कुणीही आज कामावर गेले नाही किंवा कुणाकडे चुलही पेटली नाही. वीरेंद्र यांचा मुलगा व सून पुण्याला नोकरीवर आहेत. पत्नीही मुलाकडेच असल्याने वीरेंद्रसुद्धा पुण्याला जाणार होते. आदर्श शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित होते. विशेष असे ३ जुलै रोजी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या अनुषंगाने बैठक बोलविण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच गावच्या पोलीस पाटलाचा खून केला गेला. रात्री १० वाजता पोलिसांची जीप कारेगाव येथे होती. तेथून दोन किमी अंतरावर यावली (ईजारा) येथील पोडावर १०.३० वाजता वाद उद्भवल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पोलीस यावलीत पोहोचले नाही. त्यामुळेच गावकऱ्यांचा पोलिसांविरोधात रोष आहे. त्यामुळेच सरपंच, सदस्य व गावकरी यवतमाळ मुख्यालयी प्रेत घेऊन धडकले होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे तणाव निवळला. यावली ग्रामपंचायतीने यापूर्वीच दारुबंदीसाठी ठराव घेतला होता. यावली गावात दारूच्या पाच भट्ट्या असून नियमित २० पेट्या दारू बाहेरुन पुरवठा होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप होत आहे. (वार्ताहर)