वणी : हे युग नव्या युगाकडे झेपावत असून प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने आपल्या प्रगतीचे लक्ष ठेवून आपली प्रगती साधायची असेल, तर प्रतिष्ठेच्या व मोक्याच्या जागेवर बसले पाहिजे व हे साध्य करण्यासाठी आपण शिक्षण घेऊन तेवढे समर्थ बनले पाहिजे, असे परखड प्रतिपादन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. ते जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित सामाजिक न्याय दिनप्रसंगी उद्घाटनीय भाषण करीत होते.येथे रविवारी अखिल भारतीय आदिवासी संवैधानिक हक्क परिषदेतर्फे जागतिक आदिवासी दिनादिमित्त आदिवासी जमाती सामाजिक न्याय दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील साहित्यिक गीत घोष होते. उद्घाटक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, स्वागताध्यक्ष गजानन कुडमेथे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद धुर्वे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, अल्का टेकाम (त्र्यंबके), दयालाल अरके, उत्तम गेडाम, बद्रुद्दीन हिराणी, अनिल उत्तरवार, मनीषा तिराणकर, शीला राजगडकर, बेबी मेश्राम, राजू गेडाम व प्रकाश डाहुले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात पवन पंधरे यांच्या स्वागतपर नृत्याने झाली. उद्घाटन करताना अखिलेश कुमार सिंह पुढे म्हणाले, शिक्षणाने माणसाला सर्वच क्षेत्रात आपला दर्जा सिद्ध करता येतो. त्यामुळे आदिवासी समाजाने स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवून ज्ञान संपादन करावे. आदिवासी बांधवांनी भरपूर ज्ञानार्जन करून नवा समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात गीत घोष यांनी आदिवासी जागतिक दिन हा आमच्या पूर्वजांच्या संघर्षाला लागलेले फळ असून या संघर्षाचे जतन येत्या काळात आम्हाला करता आले पाहिजे. त्यासाठी सामाजिक ऐक्याला पोलादी ताकद देण्यासाठीच या सामाजिक न्याय दिनाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक सुनीता तोडसाम, संचालन वसुंधरा मडावी यांनी केले. आभार कैलास मेश्राम यांनी मानले. भारत मेश्राम, संतोष पेंदोर, अॅड. अरविंद सिडाम, जगदीश चांदेकर, मंथना सुरपाम, ज्योती मेश्राम, लक्ष्मी धुर्वे, दादा आत्राम, कुंदा कोवे, शालीक टेकाम, ललिता आत्राम, सुभाष चांदेकर, राजू गालेवार, कैलास सिडाम, कैलास मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. (कार्यालय प्रतिनिधी)
मोक्याच्या जागी बसण्यासाठी समर्थ बना
By admin | Updated: August 12, 2015 03:12 IST