शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
2
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
3
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
4
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
5
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
6
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
7
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
8
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
9
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
10
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
11
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
12
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
13
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
14
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
15
परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद! ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार?
16
बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल
17
भीषण अपघात, भरधाव कार रस्त्यावरून घसरून झाडावर धडकली, तीन मित्रांचा जागीच मृत्यू 
18
Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी
19
आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
20
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

डबघाईस आलेल्या संस्थेसाठी प्रतिष्ठेची लढाई

By admin | Updated: May 23, 2016 02:33 IST

कळंब बाजार समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा हे चार पक्ष युती करून बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी मैदानात आहे.

गजानन अक्कलवार कळंबकळंब बाजार समितीची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा हे चार पक्ष युती करून बाजार समितीवर सत्ता मिळविण्यासाठी मैदानात आहे. तसे पाहिले तर ही बाजार समितीच डबघाईस आली आहे. असे असतानाही केवळ प्रतिष्ठेसाठी चारही पक्ष कामाला लागले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीची निर्मिती करण्यात आली. परंतु येथील बाजार समिती शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे हित जोपासत असल्याचे खासगीमध्ये बोलले जायचे. असाच सूर विरोधी सोबतच सत्तारुढ संचालकांचाही होता. परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी आवाज उठवला असे कधी झाले नाही. विशेष म्हणजे विरोधी संचालकांनीही कधी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आक्रमण भूमिका घेतली हेही पाहायला मिळाले नाही. मागील पाच ते सहा वर्षामध्ये बाजार समितीचे उत्पन्न पाहिल्यास त्यामध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील बाजार समितीला उतरती कळा लागल्याचे बोलले जाते. दोन डझनाहून अधिक व्यापाऱ्यांची नोंद या ठिकाणी आहे. परंतु हर्रासावर केवळ दोन ते तीन व्यापारीच बोलीसाठी हजर असतात. व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे ते संगनमत करून भाव पाडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल हर्रासावर मोठी पिळवणूक होत असल्याची ओरड अनेकदा होते. या प्रकाराविरूध्द बाजार समिती प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचलल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या मैदानात असणाऱ्या गटाला मतदारांनी जाब विचारण्याची हिच खरी वेळ आहे. सत्तारुढ गटाने मागील काळात शेतकऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करीत केवळ बांधकाम व कर्मचारी भरतीवर लक्ष केंद्रित केले होते. बांधकामासाठी घेतलेले लाखो रुपयाचे कर्ज बाजार समितीवर आहे. कर्जाचा हप्ता भरता-भरता बाजार समितीला नाकीनऊ येत आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला शिदोरी मंडप केवळ नावापुरताच आहे. त्याठिकाणी कुठलीही सुविधा नाही. परिसर स्वच्छतेकडे बाजार समितीचे पार दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचीही ओरड होत आहे.कृषी मालाची परस्पर अवैध खरेदीकळंब शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, तूर, चना आदी शेतमालाची खासगी व्यापाऱ्यांकडून अवैध खरेदी केली जाते. काही संचालकही अवैध खरेदीच्या व्यवहारात गुंतले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. या प्रकारामुळे लाखो रुपयंचा सेस बुडविला जातो. त्यामुळेच बाजार समितीच्या नफ्यामध्ये घसरण होत आहे. बाजार समितीला तोटा तर व्यापारी नफा कमवित आहे. त्यामुळे बाजार समिती डबघाईस आली आहे. हे सर्व थांबवून बाजार समितीला उभारी देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे शेतकरी हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. याकडे नव्याने नियुक्त होणाऱ्या संचालक मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे. एवढेच नाही तर, मतदारांनीही आता सजग होण्याची गरज आहे. संचालकांची चुप्पी चर्चेचा विषय कळंब शहरात कापूस व धान्याची खुलेआम अवैध खरेदी केली जाते. हा प्रकार शेतकरी व नागरिकांना दिसत असताना पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिसू नये, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जाते. या प्रकाराविरोधात आवाज न उठविता चुप्पी साधण्यात संचालक मंडळाचे काय हित आहे, हे न समजण्याइतके नागरिक भोळे नाही. त्यामुळे यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी मतदारांनी निवडणुकीत उभ्या असणाऱ्या लोकांकडून ठोस आश्वासन घेण्याची गरज आहे. बाजार समितीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर सेस वाढविण्याकडे व शेतकऱ्यांच्या सुविधेकडे लक्ष देण्याची गरज आहे, यासाठी आता मतदारांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.