शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

बोगस पगारपत्रकाच्या आधारे ९० लाखांचा दावा फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:44 IST

बोगस पगारपत्रक सादर करून ९० लाखांचा अपघातदावा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश पांढरकवडा येथील न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देअपघात नुकसान भरपाई दावा : पांढरकवडा न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोगस पगारपत्रक सादर करून ९० लाखांचा अपघातदावा मिळविण्याचा प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. या प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, असा आदेश पांढरकवडा येथील न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पांढरकवडा पोलिसांनी चौकशी करून ९० दिवसात अहवाल न्यायालयाला सादर करा, असे या आदेशात म्हटले आहे.केळापूर पंचायत समितीत कार्यरत व्हेटरनरी सुपरवायझर रवींद्र भांडे (३५) यांचा १८ फेब्रुवारी २०१० रोजी करंजी शिवारात अपघाती मृत्यू झाला. मोटरसायकलला ट्रकने मागून धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांनी नुकसान भरपाईसाठी पांढरकवडा न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्या. आर.एन. जोशी यांच्या न्यायालयात सदर प्रकरण सुनावणीसाठी आले. मृताच्या वारसांनी रवींद्र भांडे यांचे जानेवारी २०१० चे बोगस पगारपत्रक दाखल करून ९० लाख रुपये नुकसान भरपाईची विनंती केली होती. अपघातग्रस्त ट्रक चंद्रपूर येथील अरिहंत ट्रान्सपोर्ट एजन्सीचा होता. या एजन्सीतर्फे न्यायालयात बाजू मांडताना मृताचे जानेवारी २०१० चे पगारपत्रक बनावट असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.न्यायालयात सादर केलेले जानेवारी २०१० चे पगारपत्रक २० हजार ७३१ रुपयांचे होते, तर त्याच महिन्याचा पगार दुसऱ्या पगारपत्रकात १४ हजार ४८६ रुपये दाखविण्यात आला. बोगस पगारपत्रकाची चौकशी करून फौजदारी कारवाईची मागणी ट्रकमालकांतर्फे त्यांच्या वकिलांनी केली. न्यायालयासमोर दाखल झालेले दोन वेगवेगळे पगारपत्रक प्रकरणाची चौकशी करावी, असा आदेश मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाचे सदस्य व जिल्हा न्यायाधीश आर.एन. जोशी यांनी दिला. या प्रकरणात अरिहंत एजन्सीची बाजू अ‍ॅड. पी.टी. दर्डा यांनी मांडली.